Samruddhi highway accident : चालकाला झोप लागल्याने समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

तिघांचा मृत्यू तर अपघातानंतर चालक पसार


अहमदनगर : गेल्या काही दिवसांत अपघाताच्या घटनांमध्ये (Accidents) प्रचंड वाढ झाली आहे. त्यात समृद्धी महामार्गावरील (Samruddhi highway) अपघातांचे सत्र सुरुच आहे. आज पहाटेच्या सुमारास समृद्धीवर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. चालकाला झोप लागल्याने बाजूच्या कंटेनरला धडक लागल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.


समृद्धी महामार्गावर पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस स्टेशन हद्दीत अपघाताची घटना घडली. अहमदनगरहून रायपूरकडे जाणाऱ्या खासगी टेम्पो ट्रॅव्हलची बाजूच्या कंटेनरला धडक लागल्याने हा भीषण अपघात झाला.


चालकाला पहाटे झोप लागल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील वाढोना शिवणी दरम्यान चॅनल १२८ वर हा अपघात घडला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी आहेत. अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला. या अपघाताचा पुढील तपास तळेगाव दशासर पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

Multi Tunneling Mumbai :मुंबईत उभारणार बोगद्यांचे जाळे ; ४,३९२ कोटींचा खर्च अपेक्षित

मुंबई : मुंबईत सातत्याने पायाभूत सुविधांचे जाळे उभारले जात असले, तरी रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या अद्याप

The Mithi River : मिठी नदीतील भराव संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठीच

मुंबई : मिठी नदीत कंत्राटदाराकडून बांधकामाचा राडारोडा (डेब्रीज) टाकून आणि त्यात चिखल मिसळून भ्रष्टाचार केला जात

Old Building : जुन्या इमारती अतिधोकादायक दाखवण्यामागे सल्लागारांचा खेळ?

मुंबई  : मुंबईतील ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट (संरचनात्मक परीक्षण) करताना, अनेक सल्लागार

Devendra Fadnavis : इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर

मुंबई : इराण-अमेरिका युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा परिणाम देशातील पेट्रोलियम

Mrinal Tai Gore Flyover Extension : अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगावकरांचा वेळ वाचणार, मृणालताई गोरे विस्तारीत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव पश्चिम येथील राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोडदरम्यानच्या मृणालताई गोरे

The Fort owners : किल्लेदारांनी बोटीतून केली मिठी नदीची सैर... दाखवला नदीत कचऱ्यासह तीन फुटांपर्यंतचा गाळ

मुंबई : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात असून सत्ताधारी पक्षाकडून प्रत्येक