Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनी फिरण्यासाठी ही आहेत बेस्ट ऐतिहासिक ठिकाणे

  86

मुंबई:या वर्षी २६ जानेवारी २०२४ला भारत आपला ७५वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. देशभरात या दिवशी सुट्टी असते. २६ जानेवारीच्या दिवशी दरवर्षी दिल्लीच्या कर्तव्य पथावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हा दिवस विविधतेत एकता हे दर्शवतो.


सोबतच या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या शूरवीर सैनिकांच्या आठवणी ताज्या केल्या जातात. यावर्षी २६ जानेवारी शुक्रवारी येत आहे. अशातच शुक्रवार, शनिवार आणि रविवार हा लाँग वीकेंड येत आहे. त्यामुळे तुम्ही या वीकेंडला भारतातील ऐतिहासिक ठिकाणी जाऊ शकता.


दिल्ली - जर तुम्हाला प्रजासत्ताक दिनाचा भव्यदिव्य सोहळा पाहायला असेल तर तुम्ही दिल्लीला जाऊ शकता. दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाचा सोहळा उत्साहात तसेच जल्लोषात पार पाडला जातो. या दिवशी परेडचेही आयोजन केले जाते. ही परेड राष्ट्रपती भवनाच्या गेटपासून सुरू होत इंडिया गेट पर्यंत पोहोचते.


जालियनवाला बाग - २६ जानेवारीच्या निमित्ताने तुम्ही जालियनवाला बाग येथेही फिरायला जाऊ शकता. जालियनवाला बाग असे ठिकाण आहे जिथे हजारो सामान्य लोकांवर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला होता. जालियनवाला बाग पंजाबच्या अमृतसर येथे आहे. येथे तुम्ही वाघा-अटारी बॉर्डरही पाहू शकता.


साबरमती आश्रम - अहमदाबाद स्थित साबरमती आश्रम, स्वातंत्र्य आंदोलनादरम्यान महात्मा गांधींच्या जीवनाची झलक सादर करतात. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने येथे अनेक प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले असते.


कारगिल वॉर मेमोरियल - प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तुम्ही लडाखस्थित कारगिल वॉर मेमोरियलही फिरायला जाऊ शकता. १९९९मध्ये झालेल्या कारगिल युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानला हरवले होते. या युद्धात शहीद झालेल्या भारतीय वीर पुत्रांना श्रद्धांजली देण्यासाठी कारगिल वॉर मेमोरियल बनवण्यात आले होते.

Comments
Add Comment

शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता का होते?

Vitamin E : व्हिटॅमिन ई हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे केवळ आपल्या त्वचेच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीच आवश्यक नाही,

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न