नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले. मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी नियंत्रणात आणणारा अटल सेतू (Atal Setu), ३० हजार कामगारांच्या घराचं स्वप्न पूर्ण करणारी सोलापूरमधील कामगार वसाहत (Solapur labour colony) असे अनेक प्रकल्प सुरु करण्यात आले. हिंदूंसाठी अत्यंत पवित्र अशा भव्य राम मंदिराचे (Ayodhya Ram Mandir) उद्घाटनही करण्यात आले. यानंतर आता भारत सरकार आणखी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या तयारीत आहे.
देशातील ईस्टर्न (Eastern) आणि वेस्टर्न (Wetsern) डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरला (Dedicated Freight Corridors) जोडणाऱ्या इलेक्ट्रिक दुहेरी रेल्वे मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या उद्घाटन करणार आहेत. ही रेल्वे लिंक न्यू खुर्जा जंक्शन ते रेवाडी रेल्वे स्थानकाला जोडणार आहे. त्यामुळे प्रवासी रेल्वे गाड्यांना होणारा विलंब दूर होईल आणि देशातील लॉजिस्टिक खर्चात लक्षणीय घट होईल. एवढेच नाही तर खुर्जा ते रेवाडी दरम्यान लागणारा वेळ २० तासांनी कमी होईल. डीएफसीच्या निर्मितीनंतर देशातील मालगाड्यांना गाझियाबाद आणि दिल्लीच्या गजबजलेल्या एनसीआर भागातून जावे लागणार नाही.
देशातील दोन डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरला (DFC) जोडणारी ही रेल्वे लिंक १७३ किलोमीटर लांब आहे. यासाठी १० हजार १४१ कोटी रुपये खर्च आला आहे. ती नोएडातील न्यू बोराकी येथून सुरू होईल आणि या मार्गावर न्यू दादरी, न्यू फरिदाबाद, न्यू पृथला, न्यू तवाडू आणि न्यू धारुहेरा अशी सहा स्थानके असतील.
या भागावर एक किलोमीटर लांबीचा दुहेरी रेल्वे बोगदाही बांधण्यात आला आहे. जगातील हा अशा प्रकारचा पहिला बोगदा आहे. या बोगद्यातून डबल डेकर कंटेनरही सहज जाऊ शकतात. हा रेल्वे दुवा दादरी येथे ४.५४ किमी लांबीच्या रेल्वे उड्डाणपुलाद्वारे (RFO) DFC ला भारतीय रेल्वेशी जोडतो.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…