Lok Sabha Election 2024 : शहरांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये (Lok Sabha Election 2024) प्रत्येकाचे मत विचारात घेण्यासाठी जास्तीत जास्त मतदान व्हावे असा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे शहरी मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये देखील आता मतदान केंद्रे (Voting Centres In Co operative Society) सुरू करण्यात येणार आहेत.


यापूर्वी निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) निर्धारित केलेल्या मतदान केंद्रांवरच मतदान करता येत होतं. निवडणूक आयोगाच्या या ताज्या निर्णयानंतर आता मात्र शहरातील गृहनिर्माण सहकारी सोसायट्यांमध्येही मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या गृहनिर्माण सोसायटीत मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहेत, त्या सोसायटीतील रहिवाशांबरोबरच त्या सोसायटीच्या बाहेरच्या नागरिकांना देखील त्या ठिकाणी मतदान करण्यासाठी जावं लागणार आहे. मात्र, या निर्णयाला काही ठिकाणी मतदार आणि राजकीय पक्षांकडून आक्षेप घेतला जाण्याची देखील शक्यता आहे.



महाराष्ट्रातील या शहरांमध्ये सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र


महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेल्या जिल्ह्यांमधे अशी मतदान केंद्रे तयार करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानंतर पुण्यातील मतदारांची संख्या वाढल्याने ३६ गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र तयार करण्याचं निश्चित करण्यात आलं आहे.



पुण्यातील मतदारांची संख्या वाढली


पुण्यातील मतदारांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्याची अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार पुण्यात एक लाख ७५ हजार मतदारांची संख्या वाढली आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे महिला आणि तरुण मतदारांची संख्या वाढल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. वाढ झालेल्या मतदारांमध्ये महिला मतदारांची संख्या ९७ हजार ३५० पेक्षा अधिक आहे. १८-१९ वयोगटातील ४५ हजार आणि २०-२९ गटातील ६५ हजार ९८४ नवमतदारांची वाढ झाली आहे.


Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या