Rahul Gandhi : राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांविरोधात आसाममध्ये एफआयआर दाखल

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली माहिती


मुंबई : भारत जोडो न्याय यात्रेमुळे (Bharat Jodo Nyay Yatra) आसाममध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. परवानगी नसतानाही मुख्य रस्त्यावरुन काढलेल्या यात्रेमुळे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी काँग्रेस नेत्यांविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे. राहुल गांधींसोबतच के.सी. वेणुगोपाल, कन्हैय्याकुमार आदी नेत्यांविरोधात एफआयआर दाखल झाला आहे.


हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्वीट करून सांगितले आहे की, काँग्रेसच्या सदस्यांनी हिंसाचार, चिथावणी देणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी राहुल गांधी, केसी वेणुगोपाल, कन्हैया कुमार आणि इतर लोकांविरुद्ध कलम १२० (बी) १४३/१४७/१८८/२८३/४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री बिस्वा यांनी दिली. त्याशिवाय पीडीपीपी कायद्यातील कलम ३५३ (लोकसेवकावर हल्ला), कलम ३३२ (लोकसेवकाला कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी स्वेच्छेने गंभीर दुखापत करणे), आणि कलम ३३३ (लोकसेवकाला कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी स्वेच्छेने गंभीर दुखापत करणे) आदींसारखे अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.





याआधी मंगळवारी २३ जानेवारी रोजी राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला गुवाहाटीत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले होते. यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करत बॅरिकेड्स तोडले. यावर मुख्यमंत्री सरमा यांनी म्हटले की, हिंसा ही आसामच्या संस्कृतीचा भाग नाही. आम्ही शांतताप्रिय राज्य आहोत. असे नक्षलवादी डावपेच आपल्या संस्कृतीच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत. तुमच्या बेजबाबदार वृत्तीमुळे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्यामुळे गुवाहाटीच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचे त्यांनी म्हटले. या सर्व प्रकरणामुळे लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना काँग्रेस पक्षाच्या अडचणी वाढणार आहेत.

Comments
Add Comment

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना