Train Accident : विरार-चर्चगेट लोकल ट्रेनने तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना चिरडले

वसई : रेल्वे ट्रॅक दुरुस्तीचे काम करत असताना वसई (Vasai) आणि नायगाव (Naigaon) रेल्वे स्थानकादरम्यान लोकल ट्रेनच्या अपघातात (Train Accident) तीन रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना काल रात्री ८.५० वाजता घडली.


चिफ सिग्नल इन्स्पेक्टर वासू मित्रा (वय ५६), टेक्निशिअन सोमनाथ उत्तम (वय ३६), असिस्टंट सचिन वानखडे (वय ३५) असे मयत रेल्वे कर्मचा-यांची नावे आहेत. नायगाव आणि वसई रेल्वे स्थानकादरम्यान ट्रॅक चेंज करण्याची पॉईंट मशिन फेल झाली असल्याने त्याच्या तपासणीचे काम हे तिघेजण करत होते. त्याच दरम्यान विरारहून चर्चगेटला जाणारी लोकल ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक २ हून चर्चगेटच्या दिशेने जात असताना, हे तिनही कर्मचारी रेल्वे खाली आले. यात तिघांचा चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला.


मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, यातील सोमनाथ उत्तम यांचा मृतदेह सोलापूरला त्यांची गावी नेण्यात आला. सचिन वानखडे यांचा मृतदेह नागपूरला नेण्यात आला तर वासू मित्रा यांचा मृतदेह वसई येथे नेण्यात आला आहे. हा अपघात कसा झाला. यात निष्काळजीपणा कुणाचा याबाबात आता रेल्वे प्रशासन चौकशी करत आहे.

Comments
Add Comment

लालबागच्या राजाच्या विसर्जनाला का होतोय उशीर ?

मुंबई : सेलिब्रेटी, खेळाडू, राजकारणी यांच्यासह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे विसर्जन

मुंबईत गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, विजेचा धक्का लागून ५ जण गंभीररित्या भाजले; एकाचा मृत्यू

मुंबई: मुंबईत गणपती विसर्जनादरम्यान एक दुःखद घटना घडली आहे. साकीनाका येथील खैराणी रोडवरील एस.जे. स्टुडिओजवळ

Lalbaug visarjan 2025: मुंबईच्या एकतेचे दर्शन: लालबागचा राजा आणि भायखळ्याची हिंदुस्तानी मशीद Video पहाच..

मुंबई: आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप देताना, मुंबईतील गणेश विसर्जन सोहळ्यात एक अनोखे आणि

मुंबई पोलिसांना धमकीचा संदेश पाठवणारा 'बिहारी' नोएडात सापडला

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या उत्सवाच्या एक दिवस आधी मुंबईच्या वाहतूक पोलिसांना धमकीचा संदेश पाठवणाऱ्या एका

महाराष्ट्रात गणेश विसर्जन उत्साहात

मुंबई : गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुका वाजत गाजत आणि गणपती बाप्पाच्या जयघोषात सुरू आहेत.

३,१९० कोटींचे मालक अमिताभ बच्चन; पण संपत्तीचा वारस कोण? कोणाला किती मिळणार?

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन हे केवळ अभिनयाचेच नव्हे तर प्रचंड संपत्तीचेही बादशाह आहेत.