Train Accident : विरार-चर्चगेट लोकल ट्रेनने तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना चिरडले

वसई : रेल्वे ट्रॅक दुरुस्तीचे काम करत असताना वसई (Vasai) आणि नायगाव (Naigaon) रेल्वे स्थानकादरम्यान लोकल ट्रेनच्या अपघातात (Train Accident) तीन रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना काल रात्री ८.५० वाजता घडली.


चिफ सिग्नल इन्स्पेक्टर वासू मित्रा (वय ५६), टेक्निशिअन सोमनाथ उत्तम (वय ३६), असिस्टंट सचिन वानखडे (वय ३५) असे मयत रेल्वे कर्मचा-यांची नावे आहेत. नायगाव आणि वसई रेल्वे स्थानकादरम्यान ट्रॅक चेंज करण्याची पॉईंट मशिन फेल झाली असल्याने त्याच्या तपासणीचे काम हे तिघेजण करत होते. त्याच दरम्यान विरारहून चर्चगेटला जाणारी लोकल ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक २ हून चर्चगेटच्या दिशेने जात असताना, हे तिनही कर्मचारी रेल्वे खाली आले. यात तिघांचा चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला.


मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, यातील सोमनाथ उत्तम यांचा मृतदेह सोलापूरला त्यांची गावी नेण्यात आला. सचिन वानखडे यांचा मृतदेह नागपूरला नेण्यात आला तर वासू मित्रा यांचा मृतदेह वसई येथे नेण्यात आला आहे. हा अपघात कसा झाला. यात निष्काळजीपणा कुणाचा याबाबात आता रेल्वे प्रशासन चौकशी करत आहे.

Comments
Add Comment

राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर आरोप: जयकुमार गोरे म्हणाले, "मतदार याद्या पहिल्यांदाच पाहिल्या असाव्यात!"

मुंबई : महाराष्ट्रात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे

मुंबई विमानतळावर १.६ कोटींच्या सोन्याची तस्करी, दोघांना अटक

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मोठी कारवाई करत दोन सफाई

मुंबईतील रेल्वे स्थानकावर जन्मलेल्या बाळाची प्रकृती चिंताजनक

मुंबई : राम मंदिर रेल्वे स्थानकावर जन्मलेल्या बाळाची प्रकृती चिंताजनक आहे. हे बाळ सध्या कूपर रुग्णालयात उपचार

मिनिटांत पार्सल पोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयला एका ऑर्डरमागे किती पैसे मिळतात ? जाणून घ्या वास्तव

मुंबई : आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन डिलिव्हरी ही आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली आहे. Zepto, Zomato, Amazon, Myntra यांसारख्या

महापालिका आयुक्त थेट घरीच पोहोचले आणि त्यांच्यात यंदाच्या दिवाळीत आनंदाची लहर उमटली

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी म्हणजे असे व्यक्तिमत्व जे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ३३ लाख पूरग्रस्त शेतकऱ्यांना ३ हजार कोटींची मदत

मुंबई : यंदा सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्र्रात पावसाने थैमान घातले. शेतीपासून लोकांची घरंदारं सगळंच पावसात