श्रीरामांची प्राण प्रतिष्ठा होत असतानाच महिलेने दिला जुळ्या मुलांना जन्म, नाव ठेवले...

मुंबई: मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठेचा सोहळा २२ जानेवारीला उत्साहात संपन्न होत असतान मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्हा रुग्णालयात एका महिलेने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. या बाळांचे नाव ठेवण्यात आले राम आणि लक्ष्मण.


२२ जानेवारी म्हणजेच रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेचा दिवस अनेकांसाठी अविस्मरणीय ठरला. छतरपूर जिल्हा रुग्णालयात ३१ प्रसूती झाल्या. यात २४ नॉर्मल आणि ८ सिझेरियन डिलीव्हरी झाल्यात १९ मुले आणि १३ मुलींनी या दिवशी जन्म घेतला.


या खास निमित्ताने मुले आणि मुलींची नावे राम आणि सीतेवरून ठेवण्यात आली. हॉस्पिटलमध्ये बाळांच्या आवाजाने तेथील कुटुंबीय आणि प्रसूती झालेल्या मातांच्या आनंदाला पारावर उऱला नव्हता.


रुग्णालयात एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. या मुलांचे नाव राम आणि लक्ष्मण ठेवण्यात आले. आपल्या घरात साक्षात राम आणि लक्ष्मण यांनी जन्म घेतल्याच्या भावना या कुटुंबाने यावेळी व्यक्त केल्या.



मध्य प्रदेशात सर्वाधिक ५००हून अधिक बाळांचा जन्म


मध्य प्रदेशमध्ये या दिवशी म्हणजेच २२ जानेवारीला एकूण ५०० हून अधिक बाळांचा जन्म झाला. एकट्या राजधानी भोपाळमध्ये १५० हून अधिक डिलीव्हरी झाल्या. याशिवाय ग्वालियारमध्ये ९०, इंदौरमध्ये ३५ आणि शिवपुरीमध्ये ३३ हून अधिक मुलांचा जन्म झाला.

Comments
Add Comment

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार

किश्तवाड जिल्ह्यातील रतले जलविद्युत प्रकल्पात २९ संशयित मजूर ?

श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे चिनाब नदीवर उभारल्या जाणाऱ्या ८५० मेगावॉट क्षमतेच्या ‘रतले हायड्रो

‘एगोज’च्या प्रसिद्ध ब्रँडची अंडी वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली  : अंड्याला आरोग्यासाठी ‘सुपरफूड’ मानले जाते, मात्र सध्या अंड्यांच्या गुणवत्तेवरून देशभरात एकच खळबळ

पत्नीकडे घर खर्चाचा हिशोब मागणे गुन्हा नाही

नवी दिल्ली  : पतीने पत्नीला घर खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी एक्सेल शीट बनवण्यास सांगणे क्रुरता नाही, तसेच या

अयोध्येच्या राम मंदिरात ७० नवे पुजारी

नवी मुंबई  : अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

चालक परवान्याचे वेळेत नूतनीकरण करणे अनिवार्य

नवी दिल्ली  : चालक परवान्याची मुदत ज्या दिवशी संपते, त्याच दिवसापासून संबंधित व्यक्तीचा चालक म्हणून असलेला दर्जा