श्रीरामांची प्राण प्रतिष्ठा होत असतानाच महिलेने दिला जुळ्या मुलांना जन्म, नाव ठेवले...

मुंबई: मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठेचा सोहळा २२ जानेवारीला उत्साहात संपन्न होत असतान मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्हा रुग्णालयात एका महिलेने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. या बाळांचे नाव ठेवण्यात आले राम आणि लक्ष्मण.


२२ जानेवारी म्हणजेच रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेचा दिवस अनेकांसाठी अविस्मरणीय ठरला. छतरपूर जिल्हा रुग्णालयात ३१ प्रसूती झाल्या. यात २४ नॉर्मल आणि ८ सिझेरियन डिलीव्हरी झाल्यात १९ मुले आणि १३ मुलींनी या दिवशी जन्म घेतला.


या खास निमित्ताने मुले आणि मुलींची नावे राम आणि सीतेवरून ठेवण्यात आली. हॉस्पिटलमध्ये बाळांच्या आवाजाने तेथील कुटुंबीय आणि प्रसूती झालेल्या मातांच्या आनंदाला पारावर उऱला नव्हता.


रुग्णालयात एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. या मुलांचे नाव राम आणि लक्ष्मण ठेवण्यात आले. आपल्या घरात साक्षात राम आणि लक्ष्मण यांनी जन्म घेतल्याच्या भावना या कुटुंबाने यावेळी व्यक्त केल्या.



मध्य प्रदेशात सर्वाधिक ५००हून अधिक बाळांचा जन्म


मध्य प्रदेशमध्ये या दिवशी म्हणजेच २२ जानेवारीला एकूण ५०० हून अधिक बाळांचा जन्म झाला. एकट्या राजधानी भोपाळमध्ये १५० हून अधिक डिलीव्हरी झाल्या. याशिवाय ग्वालियारमध्ये ९०, इंदौरमध्ये ३५ आणि शिवपुरीमध्ये ३३ हून अधिक मुलांचा जन्म झाला.

Comments
Add Comment

Gujarat News : गुजरात एटीएसची मोठी कारवाई! घातक विष 'रायसिन' तयार करणाऱ्या डॉक्टरसह तिघांना अटक

अहमदाबाद : गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) राज्यात मोठे दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट उधळून लावत, चिनी एमबीबीएस

चंद्रयान-२ पुन्हा चर्चेत; इस्राोने शेअर केली मोठी माहिती !

नवी दिल्ली : सहा वर्षांपूर्वी प्रक्षेपित झालेल्या चंद्रयान-२ बद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो)

डिजिटल सोन्यात गुंतवणूक करत असाल तर सावधान !

आम्ही जबाबदार नाही; सेबीचा सतर्कतेचा इशारा नवी दिल्ली  : बदलत्या काळानुसार सोन्यातील गुंतवणुकीच्या

बिहार निवडणुकीचा प्रचार संपला

दुसऱ्या टप्प्यासाठी १२२ जागांवर मंगळवारी मतदान पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा उडालेला धुरळा आता बसला आहे.

असीम मुनीर यांना विशेष अधिकार देण्यावरून पाकिस्तानात विरोधकांचे देशव्यापी आंदोलन

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये २७ व्या संविधान सुधारणा विधेयकामुळे तणाव निर्माण झाला आहे. संविधान सुधारण्यानंतर

भारताच्या मुलीची ऐतिहासिक कामगिरी! तिरंदाजी स्पर्धेत भारतीय एबल-बॉडी ज्युनियर संघात निवड

मुंबई: देणाऱ्याने देताना काहीतरी विचार केलाच असेल, असं आपण नेहमीच म्हणतो. मग ते सुख असो किंवा दु:ख... आणि याचा अनुभव