Bharat Ratna Award: बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मिळणार भारतरत्न, मोदी सरकारची मोठी घोषणा

नवी दिल्ली: बिहारचे(bihar) माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर(karpoori thakur) यांना भारतरत्न दिला जाणार आहे. त्यांना मरणोत्तर भारतरत्न दिला जाणार आहे. सरकारने ही घोषणा कर्पूरी ठाकूर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला केली आहे. २४ जानेवारीला त्यांची जयंती आहे.


कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न दिला जावा अशी मागणी दीर्घकाळापासून केली जात होती. मंगळवारी जदयू नेते केसी त्यागी ठाकूर यांना भारतरत्न देण्यासोबतच त्यांच्या नावाने विश्वविदयालय सुरू करण्याची मागणी केली होती.



काय म्हणाले पंतप्रधान मोदी?


मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत सोशल साईटवरून कर्पूरी ठाकूर यांचा फोटो शेअर करत लिहिले, मला आनंद आहे की भारत सरकारने सामाजिक न्यायाचे प्रतीक महान जननायक कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्नने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तेही अशा वेळेस जेव्हा आपण त्यांची जन्मशताब्दी साजरी करत आहोत.


 


कर्पूरी ठाकूर यांना बिहारमध्ये जननायक म्हणून ओळखले जाते. ते काही काळासाठी बिहारचे मुख्यमंत्री राहिले होते. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी १९७० ते १९७१ या कार्यकालात काम केले होते. त्यानंतर डिसेंबर १९७७ ते एप्रिल १९७९ पर्यंत ते मुख्यमंत्री पदावर राहिले. पहिल्यांदा ते सोशलिस्ट पार्टी आणि भारतीय क्रांती दलाच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री बनले होते आणि दुसऱ्यांदा ते जनता पार्टीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री बनले होते.



स्वतंत्रता आंदोलनात झाले होते सहभागी, तुरुंगातही गेले होते


कर्पूरी ठाकूर यांचा जन्म बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्याच्या पिताँझिया गावात गोकूल ठाकूर आणि रामदुलारी देवी यांच्या घरात झाला होता. विद्यार्थी जीवनात राष्ट्रवादी विचारांनी प्रभावित होते आणि ऑल इंडिया स्टुंड्टस फेडरेशनमध्ये सामील होते. त्यांनी भारत छोडो आंदोलनात सामील होण्यासाठी स्नातक कॉलेज सोडले होते. स्वतंत्रता आंदोलनात सामील होण्यासाठी त्यांनी २६ महिने जेलमध्ये घालवले होते.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात एप्रिलपासून मतदार याद्यांचे सखोल पुनरावलोकन

निवडणूक आयोगाचे २२ राज्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांना लेखी निर्देश नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने

महाराष्ट्रातील स्टार्टअपच्या कामगिरीची मंत्री नितेश राणे यांच्याकडून प्रशंसा

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती, जागतिक एआय रोडमॅपचा घेतला सखोल आढावा नवी

इंडिया AI इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये 'कुंभदूत' एजेंटिक AI संकल्पनेचे सादरीकरण

सिंहस्थ २०२७ पूर्वी टप्प्याटप्प्याने तंत्रज्ञानाचा उपयोग नवी दिल्ली / नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आता गुपचूप लग्न शक्य नाही? गुजरातमध्ये विवाह नोंदणीसाठी नवा प्रस्ताव

अहमदाबाद : गुजरातमध्ये विवाहाच्या नोंदणीत काही बदल करण्यात आले आहेत. सध्याच्या नियमांनुसार, विवाहाची नोंदणी

VIRAL VIDEO : सावधान! देवभूमीचा ट्रिप प्लॅन करताय? हा थरारक व्हिडिओ पाहून तुमचेही पाय लटपटतील!

देहराडून : उत्तराखंडमधील प्रसिद्ध सिद्धपीठ माता धारी देवी मंदिराजवळ नदीपात्रात दोन बोटींची समोरासमोर भीषण धडक

India AI Impact Summit 2026 : एआय समिटमध्ये महाराष्ट्राचा डंका! कृषी विकासासाठी 'महाॲग्री एआय' ठरणार गेमचेंजर - मुख्यमंत्री फडणवीस

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे