Bharat Ratna Award: बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मिळणार भारतरत्न, मोदी सरकारची मोठी घोषणा

  92

नवी दिल्ली: बिहारचे(bihar) माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर(karpoori thakur) यांना भारतरत्न दिला जाणार आहे. त्यांना मरणोत्तर भारतरत्न दिला जाणार आहे. सरकारने ही घोषणा कर्पूरी ठाकूर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला केली आहे. २४ जानेवारीला त्यांची जयंती आहे.


कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न दिला जावा अशी मागणी दीर्घकाळापासून केली जात होती. मंगळवारी जदयू नेते केसी त्यागी ठाकूर यांना भारतरत्न देण्यासोबतच त्यांच्या नावाने विश्वविदयालय सुरू करण्याची मागणी केली होती.



काय म्हणाले पंतप्रधान मोदी?


मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत सोशल साईटवरून कर्पूरी ठाकूर यांचा फोटो शेअर करत लिहिले, मला आनंद आहे की भारत सरकारने सामाजिक न्यायाचे प्रतीक महान जननायक कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्नने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तेही अशा वेळेस जेव्हा आपण त्यांची जन्मशताब्दी साजरी करत आहोत.


 


कर्पूरी ठाकूर यांना बिहारमध्ये जननायक म्हणून ओळखले जाते. ते काही काळासाठी बिहारचे मुख्यमंत्री राहिले होते. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी १९७० ते १९७१ या कार्यकालात काम केले होते. त्यानंतर डिसेंबर १९७७ ते एप्रिल १९७९ पर्यंत ते मुख्यमंत्री पदावर राहिले. पहिल्यांदा ते सोशलिस्ट पार्टी आणि भारतीय क्रांती दलाच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री बनले होते आणि दुसऱ्यांदा ते जनता पार्टीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री बनले होते.



स्वतंत्रता आंदोलनात झाले होते सहभागी, तुरुंगातही गेले होते


कर्पूरी ठाकूर यांचा जन्म बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्याच्या पिताँझिया गावात गोकूल ठाकूर आणि रामदुलारी देवी यांच्या घरात झाला होता. विद्यार्थी जीवनात राष्ट्रवादी विचारांनी प्रभावित होते आणि ऑल इंडिया स्टुंड्टस फेडरेशनमध्ये सामील होते. त्यांनी भारत छोडो आंदोलनात सामील होण्यासाठी स्नातक कॉलेज सोडले होते. स्वतंत्रता आंदोलनात सामील होण्यासाठी त्यांनी २६ महिने जेलमध्ये घालवले होते.

Comments
Add Comment

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

Kolkata Rape Case : लॉ विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी, ममता सरकार निशाण्यावर

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार संचालित दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजशी संबंधित सामूहिक बलात्काराचा एक

MP News : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हामध्ये भरले २० लीटर डिझेल, मात्र निघालं १० लीटर पाणीच पाणी

डिझेल भरायला गेल्या अन् पाणी भरून आल्या... मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.