Shri Ram Pran Pratishtha: प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमासाठी अयोध्येत पोहोचला विराट कोहली? एअरपोर्टवर दिसले कुंबळे

मुंबई: अयोध्येत सोमवारी राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन होत आहे. यासाठी क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांना निमंत्रित कऱण्यात आले आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मालाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. एका रिपोर्टनुसार विराट कोहली अयोध्येत पोहोचला आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, रवींद्र जडेजा आणि अनिल कुंबळेही अयोध्येत पोहोचल्याचे वृत्त आहे. कुंबळे एअरपोर्टवर दिसले.

सोशल मीडियावर काही व्हिडिओ शेअर करण्यात आलेत. यात दावा केला जात आहे की कोहली अयोध्येत पोहोचला आहे. टीम इंडियाचे माजी क्रिकेटर अनिल कुंबळेही अयोध्येत पोहोचले आहेत. वेंकटेश प्रसादही राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी पोहोचले आहेत. प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी मिताली राज, हरमनप्रीत कौर, महेंद्रसिंग धोनी आणि रवीचंद्रन अश्विन यांनाही बोलावण्यात आले आहे.

 



भारताची स्टार शटलर सायना नेहवालही अयोध्येत पोहोचली आहे. ती म्हणाले, माझे सौभाग्य असे की मला या कार्यक्रमात सामील होण्याची संधी मिळाली. आपण इतक्या वर्षानंतर जल्लोष साजरा करत आहोत. आता फक्त त्या क्षणांची प्रतीक्षा जेव्हा आम्ही श्री रामांचे दर्शन घेऊ.

भारत आणि इंग्लंड यांच्यात २५ जानेवारीपासून कसोटी मालिका खेळवली जात आहे. यासाठी टीम हैदराबाद येथे पोहोचली आहे. कोहलीही हैदराबादला गेला होते. तेथे त्याने सराव सत्रात भाग घेतला. यानंतर अयोध्येसाठी निघाला. कर्णधार रोहित शर्मानेही सराव सुरू केला.
Comments
Add Comment

बीसीसीआयकडून धोनीला दरमहा ७० हजार रुपये पेन्शन

मुंबई : १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतरही धोनीची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही.

वैभव सूर्यवंशीचा टी-२० विश्वचषक संघात समावेश होणार?

भारताचा माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची मागणी मुंबई : माजी भारतीय कर्णधार आणि राष्ट्रीय निवड समितीचे

पहिल्याच दिवशी मेलबर्नमध्ये ७५ षटकांत २० बळी

चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला ४२ धावांची आघाडी नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ॲशेस

भारतीय महिलांचा श्रीलंकेवर एकतर्फी मालिका विजय

शफाली वर्माची ७९ धावांची वादळी खेळी नवी दिल्ली : भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्धचा तिसरा सामना ८ विकेट्सने

श्रीलंकेविरूद्धच्या खेळीत शेफाली अव्वल! भारतीय महिला क्रिकेट 'टी 20'च्या इतिहासात ठरली वेगवान अर्धशतक करणारी तिसरी फलंदाज

तिरुवनंतपुरम: भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर टी 20 मध्येही उत्कृष्ट कामगिरी कायम

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा