Ayodhya: मुकेश अंबानी यांचे संपूर्ण कुटुंब पोहोचले अयोध्येत, इतके पैसे केले दान, जाणून घ्या रक्कम

नवी दिल्ली: राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा(ram mandir pran pratishtha) समारंभात देशातील अनेक उद्योगपती पोहोचले होते. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आपल्या संपूर्ण कुटुंबासह अयोध्येत पोहोचले होते. एअरपोर्टवरून संपूर्ण कुटुंब कडक सुरक्षा व्यवस्थेत राम मंदिरात पोहोचले.


देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानीही आपल्या कुटुंबासमवेत अयोध्येत पोहोचले. त्यांची पत्नी नीता अंबानी, मुलगी इशा अंबानी, जावई आनंद पिरामल, मुलगा आकाश, अनंत अंबानी, सून श्लोका अंबानी उपस्थित होते. यावेळी संपूर्ण कुटुंब अतिशय उत्साही होते.


मुकेश अंबानी कुटुंबाने राम मंदिर ट्रस्टला २.५१ कोटी रूपयांचे दान केले. या निमित्त मुकेश अंबानी म्हणाले, भगवान श्रीराम येत आहे. २२ जानेवारीला संपूर्ण देशात राम दिवाळी असेल. मला या क्षणाचा साक्षीदार होता आले यासाठी मी सौभाग्यवान आहे. तर नीता अंबानी म्हणाल्या, जय श्री राम, हा एक ऐतिहासिक दिवस आहे. मला भारतीय संस्कृतीवर गर्व आहे.



रामाचे दर्शन घेऊन धन्य झालो


मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी म्हणाला,, हा दिवस इतिहासाच्या पानावर लिहिला जाईल. तर इशा अंबानी म्हणाले, आजचा दिवस आमच्यासाठी सर्वात पवित्र दिवसांपैकी एक आहे. इशा अंबानीसोबत तिचे पती आनंद पिरामलही येथे पोहोचले होते. ते म्हणाले, जय श्री राम.

Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या