Ayodhya: मुकेश अंबानी यांचे संपूर्ण कुटुंब पोहोचले अयोध्येत, इतके पैसे केले दान, जाणून घ्या रक्कम

  223

नवी दिल्ली: राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा(ram mandir pran pratishtha) समारंभात देशातील अनेक उद्योगपती पोहोचले होते. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आपल्या संपूर्ण कुटुंबासह अयोध्येत पोहोचले होते. एअरपोर्टवरून संपूर्ण कुटुंब कडक सुरक्षा व्यवस्थेत राम मंदिरात पोहोचले.


देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानीही आपल्या कुटुंबासमवेत अयोध्येत पोहोचले. त्यांची पत्नी नीता अंबानी, मुलगी इशा अंबानी, जावई आनंद पिरामल, मुलगा आकाश, अनंत अंबानी, सून श्लोका अंबानी उपस्थित होते. यावेळी संपूर्ण कुटुंब अतिशय उत्साही होते.


मुकेश अंबानी कुटुंबाने राम मंदिर ट्रस्टला २.५१ कोटी रूपयांचे दान केले. या निमित्त मुकेश अंबानी म्हणाले, भगवान श्रीराम येत आहे. २२ जानेवारीला संपूर्ण देशात राम दिवाळी असेल. मला या क्षणाचा साक्षीदार होता आले यासाठी मी सौभाग्यवान आहे. तर नीता अंबानी म्हणाल्या, जय श्री राम, हा एक ऐतिहासिक दिवस आहे. मला भारतीय संस्कृतीवर गर्व आहे.



रामाचे दर्शन घेऊन धन्य झालो


मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी म्हणाला,, हा दिवस इतिहासाच्या पानावर लिहिला जाईल. तर इशा अंबानी म्हणाले, आजचा दिवस आमच्यासाठी सर्वात पवित्र दिवसांपैकी एक आहे. इशा अंबानीसोबत तिचे पती आनंद पिरामलही येथे पोहोचले होते. ते म्हणाले, जय श्री राम.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.