चिंताजनक! राज्यात १८ वर्षाखालील ३६ लाख युवक उच्च रक्तदाबाच्या विळख्यात तर ४ लाख जणांना मधुमेह

राज्यात अडीच कोटी युवकांची तपासणी, ४ कोटी ६७ लाख पुरुषांच्या तपासणीचे ध्येय


मुंबई : राज्यात गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून ‘निरोगी तरूणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ या अभियानाद्वारे १८ वर्षांवरील युवकांची आरोग्यविषयक तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीद्वारे आतापर्यंत राज्यात अडीच कोटी पुरूषांची तपासणी करण्यात आली असून त्याद्वारे ३६ लाख पुरूषांना उच्च रक्तदाब, (blood pressure) ४ लाख जणांना मधुमेह (diabetes) आढळून आला आहे. यामुळे, राज्य उच्च रक्तदाबाची राजधानी होऊ पाहतेय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून ‘निरोगी तरूणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ हे अभियान राज्याच्या आरोग्य विभागाने सुरू केले असून ते यावर्षी मार्च महिन्याअखेर सूरू राहणार आहे. या अभियानाद्वारे राज्यातील १८ वर्षावरील ४ कोटी ६७ लाख पुरूषांची तपासणी करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती देताना आरोग्य खात्यातील एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, राज्यात अडीच कोटी पुरूषांची तपासणी झाली असून त्यापैकी ३२.६६ लाख जणांना वेगवेगळया आजारांसाठी वैद्यकीय उपचार देण्यात आले आहेत. तर २७ हजार ९७४ जण छोट्या-मोठ्या शस्त्रक्रियांना सामोरे गेले.


या अभियानाद्वारे अठरा वर्षावरील प्रत्येक पुरूषाची असंसर्गजन्य आजारांबाबत तपासणी करण्याचे ध्येय आहे. यामध्ये रक्तदाब, बीएमआय, लठ्ठपणासोबत गरज पडल्यास चाचण्या जसे इसीजी, सीटीस्कॅन, एक्सरे आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. तसेच ज्यांना शस्त्रक्रियांची गरज पडेल त्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून उपचार देण्यात येणार आहेत.


आरोग्यवर्धिनी केंद्र, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व सामुदायिक आरोग्य केंद्र, हिंदुह्रदयसम्राट आपला दवाखाना, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय अशा विविध स्तरावरील आरोग्य संस्थांमध्ये ही तपासणी केली जात आहे.



पुण्यात ९ लाख जणांना उच्च रक्तदाब


या अभियानाअंतर्गत पुणे विभागात ९ लाख जणांना रक्तदाब असल्याचे निदान झाले आहे. तसेच, ७५ हजार ५०० जणांना मधुमेहाचे निदान करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

सन्मानाचा अंतिम निरोपही डावलला , बेवारस मृतदेहाचा अंतिम प्रवास चक्क कचऱ्याच्या घंटागाडीतून ; कुठे घडला संतापजनक प्रकार

Jalgaon  : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातून मानवी संवेदनशीलतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल प्रकरणात नवीन वळण; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हाती प्रकरणाची धुरा

पुणे : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायालयीन लढाईला आता नवे वळण मिळाले आहे. एकीकडे आरोपी सिया

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)