U-19 World Cup 2024: टीम इंडियाची विजयी सुरूवात, बांगलादेशला ८४ धावांनी हरवले

मुंबई: भारतीय संघाने अंडर १९ विश्वचषकाची दमदार सुरूवात केली आहे. टीम इंडियाने आपल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशला हरवले. बांगलादेशला ८४ धावांनी मोठा पराभव सहन करावा लागला. बांगलादेशसमोर विजयासाठी २५२ धावांचे आव्हान होते मात्र संपूर्ण संघ ४५.५ षटकांत केवळ १६७ धावांवर आटोपला. बांगलादेशसाठी मोहम्मद शिहाब जेम्सने सर्वाधिक ७७ चेंडूत ५४ धावा केल्या. अरिफुल इस्लामने ७१ चेंडूत ४१ धावांचे योगदान दिले. मात्र बाकी फलंदाजांनी निराशा केली.


भारतासाठी सौम्य पांडेने सर्वाधिक विकेट मिळवल्या. सौम्य पांडेने ९.५ षटकांत २४ धावा देत ४ खेळाडूंना माघारी पाठवले. मुशीर खानला २ बळी मिळवता आले. याशिवाय राज लिंबानी, अर्शिन कुलकर्णी आणि प्रियांशु मोलियाने १-१ विकेट मिळवल्या.



भारतीय संघाने केल्या २५१ धावा


याआधी बांगलादेशचा कर्णधार टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या टीम इंडियाने ५० षटकांत ७ बाद २५१ धावा केल्या. भारतासाठी आदर्श सिंहने सर्वाधिक ९६ बॉलमध्ये ७६ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार ठोकले. याशिवाय भारतीय कर्णधार उदय सहारनने ९४ बॉलमध्ये ६४ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार लगावले. बांगलादेशसाठी इकबाल हौसेन इमौन सगळ्यात यशस्वी गोलंदाज ठरला.



टीम इंडियाच्या विजयानंतर किती बदलले पॉईंट्स टेबल?


या विजयानंतर भारतीय संघ आपल्या ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. पहिल्या स्थानावर आर्यंलंडचा संघ आहे. दरम्यान, भारत आणि आयर्लंड हे २-२ बरोबरीत आहे. मात्र चांगल्या रनरेटमुळे आयर्लंडचा संघ टॉपवर आहे. भारतीय संघ आपला दुसरा सामना २५ जानेवारीला आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील सामना २८ जानेवारीला खेळवला जाणार आहे.

Comments
Add Comment

IPL 2026 Wanindu Hasaranga : लखनऊची डोकेदुखी वाढली! स्टार स्पिनर हसरंगा उर्वरित स्पर्धेतून बाहेर

श्रीलंकेचा लेगस्पिनर वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) दुखापतीमुळे चालू आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. त्याच्या

IPL 2026: लखनौचा कमबॅक, KKR अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत

मुंबई : आयपीएल २०२६ मधील रंगतदार सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 3 विकेटने या सामन्याला रंग

IPL 2026 : सामना न खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने जाहीर केली नवीन नियमावली; नियमांचे पालन न केल्यास होणार कारवाई

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने आयपीएलसाठी अनेक कठोर नियम लागू केले आहेत. या नवीन

Bangladesh Cricket Board : अखेर बांगलादेश नरमला; बांग्लादेश क्रिकेट बोर्डाकडून भारताला आमंत्रण

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) (Bangladesh Cricket Board) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसी) पत्र लिहून कळवले आहे की,

IPL 2026 Sunil Gavaskar : सुनील गावस्करांची अनफिट क्रिकेटपटूंवर टीका

मुंबई : भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पुन्

IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?