Weight Loss: वेट लॉससाठी नाश्त्यात असे खा मखाणे, फूड क्रेविंगपासूनही मिळेल सुटका

  62

मुंबई: आजकाल अनेक लोक लठ्ठपणामुळे(obesity) त्रस्त आहेत. अधिक वजन खाण्याच्या पिण्याच्या सवयी आणि खराब लाईफस्टाईलमुळे वाढते. अशातच कॅलरीकडे लक्ष देणे गरजेचे असते. डाएटिंगचा अर्थ केवळ उपाशी राहणे असा नसतो. मात्र त्याऐवजी असे पदार्थ खाल्ले जे हेल्दी असतील. वजन घटवण्यासाठी नाश्त्यामध्ये मखाणा खाणे हा एक चांगला पर्याय आहे. मखाणामध्ये कमी कॅलरीज आणि फायबरचे चांगले प्रमाण असते. यामुळे पोट भरलेले राहते आणि भूकही कमी लागते. सोबतच बेली फॅट कमी करण्यासही मदत होते.



फूड क्रेविंग होते कंट्रोल


मखाणामध्ये असे पोषक तत्व असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात. मखाणामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. प्रोटीन पाचन क्रिया धीमी करते आणि दीर्घकाळापर्यंत पोट भरलेले राहते. यामुळे भोजनमधील कालावधी वाढतो. मखाणामध्ये कमी कॅलरीज आणि फॅट असते. यामुळे वजन वाढण्यापासून बचाव होते.



अशा पद्धतीने खा मखाणा


साधे मखाणा- मखाणा चांगला भाजून मीठ आणि काळी मिरी घालून खाऊ शकता.


फ्रुट मखाणा - मखाणामध्ये केळे, सफरचंद, डाळिंब इत्यादी फळे टाकून. तुम्ही हे मिश्रण दुधासोबत खाऊ शकता.


मसालेदार मखाणा - मखाणा तेलावर परतून सैंधव मीठ, लाल मिरची पावडर, हळद आणि धणे पावडर टाकून स्वादिष्ट बनवू शकता.


चाट मखाणा - मखाणा चाट बनवून नाश्त्यात खाऊ शकता. यात टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची टाका.


मखाणा पराठा - बेसन मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात मखाणा आणि मसाले मिसळून पराठा बनवू शकता.


मखाण्यामध्ये अँटी ऑक्सिडंट गुण असतात. यामुळे हळू हळू पचण्यास मदत होते. यामुळे मेटाबॉलिज्म रेग्युलेट होण्यास मदत होते. यामुळे वजन नियंत्रणात राहते. यामुळे दररोज नाश्त्यामध्ये मखाणा खाल्ल्याने वजन कमी होते. पोटही संतुष्ट राहते.

Comments
Add Comment

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर