Rajan Salvi : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ; राजन साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल!

आज सकाळीच साळवींच्या घरावर एसीबी टीमने टाकली धाड


रत्नागिरी : लोकसभा निवडणुका (Loksabha Elections) तोंडावर आलेल्या असताना ठाकरे गट (Thackeray Group) अधिकाधिक अडचणीत सापडत चालला आहे. कालच ठाकरे गटाचे सूरज चव्हाण यांना कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली. त्यानंतर आता एसीबीच्या चौकशीनंतर (ACB Inquiry) ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्पन्नापेक्षा ११८ टक्के संपत्ती जास्त असल्याचा उल्लेख आरोपपत्रामध्ये करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपपत्रात त्यांच्या पत्नी, मुलगा यांच्या नावाचा देखील नावाचा समावेश आहे. त्यामुळे साळवींना अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


आज सकाळी एसीबीच्या टीमने राजन साळवी यांच्या घरावर धाड टाकली. दोन तासांपासून त्यांच्या घराची झाडाझडती सुरु आहे. याआधीही एसीबी चौकशी आणि त्यांना लागणारी माहिती यासाठी राजन साळवींनी सहावेळा अलिबागच्या एसीपी कार्यालयात हजेरी लावली आहे. त्यानंतर एसीबीकडून राजन साळवींचा बंगला आणि रत्नागिरी शहरातील हॉटेलचं मूल्यांकन करण्यात आलं होतं. त्यात घर आणि हॉटेलच क्षेत्रफळ, एकूण जमिनीची किंमत, तसेच इंटरियर डिझाईनिंग अर्थात सजावटीसाठी करण्यात आलेला खर्च यांचं मूल्यांकन करण्यात आलं.


एसीबी चौकशीमुळे राजन साळवी यांच्यासाठी निर्माण झालेल्या अडचणी आणखी वाढताना दिसत आहेत. लाचलुचपत विभागाने काही दिवसांपूर्वी राजन साळवींच्या कुटुंबीयांना नोटीस धाडून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. साळवी यांची पत्नी, मुलगा, भाऊ, पुतणे यांची देखील चौकशी करण्यात आली.


त्यानंतर आज सकाळी रत्नागिरीतील त्यांच्या निवासस्थानी एसीबीकडून झाडाझडती सुरू झाली. सध्या साळवी आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या संपत्तीचे मूल्यांकन केले जात आहे. आरोपपत्रानुसार त्यांनी दाखवलेल्या संपत्तीपेक्षा त्यांची संपत्ती अधिक आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप त्यांच्या घराच्या झाडाझडतीचे काम सुरुच आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एसीबी काय कारवाई करते हे पाहावं लागेल.

Comments
Add Comment

Pune Traffic Update : पुणे पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गांची घोषणा

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. या

Thailand Job Scam : राज्यातील २५ तरुण थायलंड-म्यानमार सीमेवर अडकले

- सुटकेसाठी राज्य सरकार सक्रिय; मुख्यमंत्र्यांकडून गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी मुंबई : फेसबुकवरील आकर्षक

National Health Mission : NHMच्या १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; 10 वर्षांहून अधिक सेवेनंतर समायोजनाचा मार्ग मोकळा

१० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या NHM कर्मचाऱ्यांना समकक्ष पदांवर नियुक्ती मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत

Nashik Pune High Speed Rail : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेसाठी १ जुलैला मुख्यमंत्र्यांची बैठक; केंद्राकडे पाठपुराव्याचा निर्णय

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उद्या बैठक मुंबई : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे

Navnath ban : "राष्ट्र प्रथम" विचारसरणीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; काँग्रेससोबत जाणारे राऊतच खरे 'महाराष्ट्रद्रोही': भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath ban) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Harit Maharashtra : राज्यात ११ कोटी वृक्ष लागवडीसाठी नियोजनावर भर; मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

मुंबई : राज्यात यंदा ११ कोटी वृक्ष लागवडीचे (Tree Plantation) उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून हे लक्ष्य वेळेत पूर्ण