IND vs AFG: टी-२० विश्वचषकाआधी भारताचा शेवटचा टी-२० सामना आज, अफगाणिस्तानचा सुपडा होणार साफ?

  68

मुंबई: भारतीय संघ आणि अफगाणिस्तान यांच्यात आज १७ जानेवारीला ३ सामन्यांची टी-२० मालिकेतील शेवटचा सामना रंगणार आहे. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होईल. भारतीय संघाला या वर्षी जूनमध्ये टी-२० विश्वचषक खेळायचा आहे. याआधी भारताची ही शेवटची टी-२० मालिका आहे.


भारतीय संघाने या मालिकेत सुरूवातीचे २ सामने जिंकत अफगाणिस्तानविरुद्ध मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. जर भारतीय संघ तिसरा सामना जिंकत असेल तर अफगाणिस्तानला ते क्लीन स्वीप करतील.



भारत-अफगाणिस्तान ऐतिहासिक मालिका


भारताविरुद्ध अफगाणिस्तानची ही ऐतिहासिक मालिका आहे. खरंतर, दोन्ही संघादरम्यान आतापर्यंत एकच आंतरराष्ट्रीय द्वीपक्षीय मालिका खेळवण्यात आली. ही कसोटी मालिका होती जी १८ जून २०१८ मध्ये झाली होती. त्यावेळेस या द्विपक्षीय मालिकेदरम्यान केवळ एक कसोटी सामना खेळवण्यात आला होता. हा सामना भारतीय संघाने एक डाव आणि २६२ धावांनी जिंकला होता.


याशिवाय भारत आणि अफगाणिस्ता यांच्यात आतापर्यंत वनडे फॉरमॅटमध्ये कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आलेली नाही. तर दोन्ही संघादरम्यान टी-२० मालिकेतील ही पहिली मालिका आहे. अशातच अफगाणिस्तानही भारताविरुद्धची पहिली मालिका क्लीन स्वीपने हरण्यापासून बचाव करेल. त्यामुळे शेवटचा सामना जिंकण्यासाठी ते पूर्णपणे जोर लावतील.



विश्वचषकाआधी शेवटचा सामना


दुसरीकडून पाहिले तर भारतीय संघासाठी ही मालिका खास आहे कारण भारतीय संघ या वर्षी जूनमध्ये टी-२० विश्वचषक खेळणार आहे. त्याआधी भारताची ही शेवटची टी-२० मालिका आहे. अफगाणिस्तान मालिकेनंतर भारतीय संघाला आपल्या घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.


यानंतर मार्च आणि मे दरम्यान भारतीय खेळाडू इंडियन प्रीमियर लीग खेळण्यास उतरतील. यानंतर भारतीय संघ थेट टी-२० विश्वचषकात खेळेल.

Comments
Add Comment

मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सचे आरसीबीमध्ये पुनरागमनाचे संकेत, पण नव्या भूमिकेत!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा लाडका खेळाडू, 'मिस्टर ३६०'

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता