Eknath Shinde : बोलघेवडेपणा करुन महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यांमध्ये धूळ फेकता येणार नाही!

दावोस दौऱ्यावरून टीका करणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्र्यांचा घणाघात


मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काल रात्री १ वाजेच्या सुमारास दावोस दौऱ्यासाठी (Davos Visit) रवाना झाले. मात्र, ते जाण्यापूर्वी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी त्यांच्या दौऱ्यावरुन टीका केली. महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनीही या दौऱ्याबाबत प्रश्न उपस्थित केले. यावर काल मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले. 'बोलघेवडेपणा करुन महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यांमध्ये धूळ फेकता येणार नाही', असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.


आदित्य ठाकरे यांनी दावोस दौऱ्यासाठी परराष्ट्र खात्याने ५० लोकांना परवानगी दिली आहे का? असे खोचकपणे विचारले होते. यावर चोख प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, उद्योग विभाग आणि मुख्यमंत्री कार्यालय असे १० लोकांचे शिष्टमंडळ दावोसला जाते आहे. MMRDA आणि महाप्रीन असे आठ लोक जात आहेत. त्यांनाही केंद्राकडून संमती मिळाली आहे. त्यांच्यासारखे आकडे फुगवून कागदावर ठेवण्यासाठी आम्ही जात नाही.


पुढे मुख्यमंत्री म्हणाले, जे करारनामे होतील त्याची अंमलबजावणी होईल. ते काय बोललेत याबद्दल काही बोलायची आवश्यकता नाही. कारण त्यांनी जे सामंज्यस करार केले ते करार आणि प्रत्यक्षात सुरु झालेली कामे ही महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहेत. फक्त बोलघेवडेपणा करुन महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यांमध्ये धूळ फेकता येणार नाही. जे करार आम्ही करु त्याची अंमलबजावणी होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.



जो खर्च होईल त्यातील प्रत्येक रुपयाचा तपशील देणार


दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेच्या माध्यमातून तीन लाख दहा हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. तसेच इतर देशांचे मंत्री तसेच मोठ्या कंपन्या आणि वित्तीय संस्थांशी चर्चा करून राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्याचा पूर्ण प्रयत्न करू. दावोस दौऱ्याबाबत विरोधकांनी केलेली टीका ही संपूर्णपणे निरर्थक असून या दौऱ्यात कोणताही अनाठायी खर्च करण्यात आला नसून जो खर्च होईल त्यातील प्रत्येक रुपयाचा तपशील सर्वसामान्य लोकांपुढे आणला जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.



अधिक विदेशी गुंतवणुकीसाठी दावोस दौरा


दरम्यान, दावोसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी तीन दिवसांचा दौरा आम्ही करतो आहोत. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात विदेशी गुंतवणूक आली पाहिजे, यासाठी चांगला फोरम दावोस या ठिकाणी मिळतो. महाराष्ट्राचे ब्रांडिंग करणे, शोकेसिंग करणे याची ही संधी असते. त्याचा फायदा महाराष्ट्राला नक्की होईल. महाराष्ट्राकडे वेगळ्या अपेक्षेने जगातले लोक पाहात आहेत. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यात विदेशी कंपन्या आग्रही आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सामंज्यस करार होतील. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Eknath Shinde : मणिपूरमध्ये सिद्धिविनायक मंदिराची प्रतिकृती उभारणार

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह 'ईशान सेतू' उपक्रमात सहभागी मुंबई

Kurla Incident : कुर्ल्यातील शितल तलावात १९ वर्षीय युवक बुडाला; शोधकार्य सुरू

मुंबई : मुंबईतील कुर्ला (Kurla) पश्चिम येथील शितल तलावात (Sheetal Talao) शुक्रवारी (१७ जुलै) एका १९ वर्षीय तरुण बुडाल्याची (Drowning)

BMC : धारावी, काळा किल्ला बेस्ट बस आगाराची जागा धारावी विकास प्रकल्पासाठीसाठी हस्तांतरीत

महापालिका सभागृहात बहुमताने प्रस्ताव मंजूर मुंबई : धारावी (Dharavi) बस डेपोची जागा पीपीपी तत्त्वावर धारावी विकास

BMC News : तातडीच्या कामकाजाच्या प्रस्तावावरून सलग दुसऱ्यांदा महापौरांकडून चूक

सत्ताधारी पक्ष दुसऱ्यांदा आला अडचणीत घाटकोपरमधील रस्ता रेषेसंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्याची महापौरांना

Chembur Tree Collapse : चेंबूरच्या झाड दुर्घटनेच्या अहवाल सत्ताधाऱ्यांनाच अमान्य

अहवालाची फेर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे महापौरांचे निर्देश सभागृहनेत्यांनी अहवालाची प्रतच सभागृहात फाडत

FDA : मुंबईच्या प्रसिद्ध पारशी डेअरी फार्मवर अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; परवाना निलंबित

मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' (Safe Food, Safe Maharashtra) या विशेष मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA)