Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खरगे यांना इंडिया आघाडीचे अध्यक्ष निवडल्याने नितीश कुमार नाराज?

नितीश कुमार यांनी संयोजकपद नाकारले


नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांची विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. इंडिया आघाडीच्या व्हर्चुअल बैठकीत खरगे यांच्या नावावर एकमत झाले. मात्र यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांना समन्वयक बनवण्याची चर्चा होती. त्याआधीच इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी खरगे यांची निवड केल्याने नाराज झालेल्या नितीशकुमार यांनी समन्वयकपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. मला कोणत्याही पदाची इच्छा नाही, असे नितीशकुमार यांनी म्हटले आहे.


विरोधी पक्षांच्या बैठकीत जागावाटपापूर्वी अध्यक्षांच्या नावावर एकमत झाले असले तरी अंतर्गत धूसफूस मात्र मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.


मीडिया रिपोर्टनुसार, विरोधी पक्षांच्या आघाडीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपाचा फॉर्मुला अद्याप निश्चीत झालेला नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे या पदासाठी उमेदवार होते. आघाडीच्या बैठकीत संयोजक पदावरही चर्चा झाली. मात्र बैठकीत खुद्द नितीश कुमार यांनीच काँग्रेसच्या नेत्याने हे पद सांभाळले पाहिजे असे सांगितले आणि स्वत: समन्वयकपद स्वीकारण्यास नकार दिल्याने विरोधी पक्षांच्या आघाडीत संभ्रमाचे वातावरण आहे.

Comments
Add Comment

मध्य प्रदेशात कफ सिरप प्रकरणात ११ मुलांच्या मृत्यूनंतर डॉक्टरला अटक

मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर भोपाळ (वृत्तसंस्था): छिंदवाडा जिल्ह्यातील पारसिया भागात कफ

जयपूर SMS हॉस्पिटलच्या ICU मध्ये भीषण आग, ६ रुग्णांचा मृत्यू

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूर येथील सवाई मानसिंह (SMS) हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरच्या न्यूरो आयसीयू (ICU)

दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाने हाहाकार; २३ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्तर बंगालच्या दौऱ्यावर

दार्जिलिंग: पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या भीषण

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत