Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खरगे यांना इंडिया आघाडीचे अध्यक्ष निवडल्याने नितीश कुमार नाराज?

नितीश कुमार यांनी संयोजकपद नाकारले


नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांची विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. इंडिया आघाडीच्या व्हर्चुअल बैठकीत खरगे यांच्या नावावर एकमत झाले. मात्र यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांना समन्वयक बनवण्याची चर्चा होती. त्याआधीच इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी खरगे यांची निवड केल्याने नाराज झालेल्या नितीशकुमार यांनी समन्वयकपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. मला कोणत्याही पदाची इच्छा नाही, असे नितीशकुमार यांनी म्हटले आहे.


विरोधी पक्षांच्या बैठकीत जागावाटपापूर्वी अध्यक्षांच्या नावावर एकमत झाले असले तरी अंतर्गत धूसफूस मात्र मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.


मीडिया रिपोर्टनुसार, विरोधी पक्षांच्या आघाडीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपाचा फॉर्मुला अद्याप निश्चीत झालेला नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे या पदासाठी उमेदवार होते. आघाडीच्या बैठकीत संयोजक पदावरही चर्चा झाली. मात्र बैठकीत खुद्द नितीश कुमार यांनीच काँग्रेसच्या नेत्याने हे पद सांभाळले पाहिजे असे सांगितले आणि स्वत: समन्वयकपद स्वीकारण्यास नकार दिल्याने विरोधी पक्षांच्या आघाडीत संभ्रमाचे वातावरण आहे.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव