अहंकारी लोकांचा अहंकार संपणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल


नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यासाठी वेळ देत असतात. पंतप्रधान मोदींना एवढं प्रेम देशात मिळते तेवढं प्रेम देशात कुणालाच मिळत नसेल. विरोधकांना हे खटकते. त्यांच्या पोटात दुखते. आता अहंकारी लोकांचा अहंकार संपणार असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 'अबकी बार 400 पार' या घोषणेची आमचीही जबाबदारी असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमीपूजन करण्यात आले. त्यावेळी नवी मुंबई विमानतळ मैदानात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं उधळताना विरोधकांवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, 50 वर्षात जे झालं नाही ते मोदींनी करून दाखवलं. आमच्या भारताच्या अर्थ व्यवस्थेला मोदींनी मजबूत केले. करोडो राम भक्तांचे जे स्वप्न होते राम मंदिर झालं पाहिजे ते आज पंतप्रधान मोदींनी पूर्ण केले. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी मोदींचे मनमोकळेपणाने अभिनंदन केले असते, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.


आज 22 किलोमीटरचा समुद्री पूल सुरू झाला आणि त्याचा शुभारंभ मोदींनी केला आहे. या सेतूचे भूमिपूजन मोदींनी केले होते आणि शुभारंभ देखील मोदींनी केलं आहे. मधल्या काळात कोविड काळ होता. तरी देखील अधिकाऱ्यांनी काम पूर्ण केले. अटल सेतू प्रकल्प गेमचेंजर आहे. अत्याधुनिक यंत्रणा वापरून हा प्रकल्प आपण पूर्ण केला आहे, असेही त्यांनी म्हटले.

Comments
Add Comment

महापालिकेच्या चार रुग्णालयांची ऑक्सिजन लेव्हल वाढणार, कोविड काळातील त्या...

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्यावतीने कोविड काळात निर्माण केलेल्या कोविड सेंटरमधील ऑक्सिजन टाक्यांचा

कार्तिकी यात्रेसाठी जादा ११५० एसटी बस सोडणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी): बंदा क्षेत्र पंढरपूर येथे २ नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी भाविक

मुंबईत आता जलवाहिनी दुरुस्तीच्या काळात होणार नाही पाणीकपात, महापालिकेने असे घेतले हाती काम...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनींमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्तीच्या काळामध्ये

भारत सागरी सप्ताह २०२५ मध्ये ५५,९६९ कोटी रुपयांचे १५ सामंजस्य करार

भारत सागरी आर्थिक महासत्ता होण्यात महाराष्ट्राचे योगदान मोलाचे ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई :

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात सहकारातून समृद्धी आणणार: मंत्री अमित शाह

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत दोन मोठ्या नौकांचे सहकारी संस्थांना वितरण मुंबई : सहकाराच्या माध्यमातून

भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी कार्यालय हे मंदिरासमान

भाजपच्या नव्या प्रदेश कार्यालयाचे अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन मुंबई : भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी