मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ आजपासून अफगाणिस्तानविरुद्ध ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. या मालिकेचा आजपासून सुरूवात झाली आहे. मोहालीमध्ये आजचा पहिला सामना रंगत आहे. यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
या टॉसदरम्यान रोहितसोबत एक मजेदार किस्सा पाहायला मिळाला. रोहित आपल्या खेळाडूचे नावच विसरला जो सामन्यात खेळणार नाही.
अँकरने जेव्हा रोहितला विचारले की कोणता खेळाडू सामन्याच्या बाहेर आहे. यावर रोहितने आवेश खान, संजू सॅमसन आणि यशस्वी जायसवाल यांची नावे घेतली. मात्र रोहित आणखी एका खेळाडूचे नाव विसरला.
तेव्हा रोहितने अँकरला सांगितले की त्याने टॉस आधी त्याला सांगितले होते ना. तेव्हा अँकर मुरली कार्तिकने स्पिनर कुलदीप यादवचे नाव घेतले. तेव्हा रोहित एकदम खुश झाला आणि त्याने अँकरच्या हो ला हो म्हटले.
रोहितचा हा मजेदार किस्सा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रोहित तब्बल १४ महिन्यांनी टी-२० क्रिकेटमध्ये परतत आहे. या सामन्यात विराट कोहली खेळत नाहीये.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…