Video : रोहित झाला कन्फ्युज...टॉसदरम्यान या खेळाडूचे नावच विसरला

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ आजपासून अफगाणिस्तानविरुद्ध ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. या मालिकेचा आजपासून सुरूवात झाली आहे. मोहालीमध्ये आजचा पहिला सामना रंगत आहे. यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.


या टॉसदरम्यान रोहितसोबत एक मजेदार किस्सा पाहायला मिळाला. रोहित आपल्या खेळाडूचे नावच विसरला जो सामन्यात खेळणार नाही.


 


अँकरने जेव्हा रोहितला विचारले की कोणता खेळाडू सामन्याच्या बाहेर आहे. यावर रोहितने आवेश खान, संजू सॅमसन आणि यशस्वी जायसवाल यांची नावे घेतली. मात्र रोहित आणखी एका खेळाडूचे नाव विसरला.


तेव्हा रोहितने अँकरला सांगितले की त्याने टॉस आधी त्याला सांगितले होते ना. तेव्हा अँकर मुरली कार्तिकने स्पिनर कुलदीप यादवचे नाव घेतले. तेव्हा रोहित एकदम खुश झाला आणि त्याने अँकरच्या हो ला हो म्हटले.


रोहितचा हा मजेदार किस्सा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रोहित तब्बल १४ महिन्यांनी टी-२० क्रिकेटमध्ये परतत आहे. या सामन्यात विराट कोहली खेळत नाहीये.

Comments
Add Comment

शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय

गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे