IND vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या टी-२०मध्ये अशी असू शकते भारताची प्लेईंग ११

मुंबई: आज म्हणजेच नव्या वर्षात २०२४मध्ये पहिल्यांदा टीम इंडिया घरच्या मैदानावर खेळण्यासाठी उतरत आहे. त्यांच्यासमोर अफगाणिस्तानचा संघ आहे. मात्र भारतीय संघ त्यांना हलक्यामध्ये घेणार नाही. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आज मोहाली येथील आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे.


दरम्यान, पहिल्या टी-२०मध्ये दोन स्टार खेळाडू खेळताना दिसणार नाही. पहिला म्हणजे भारताचा विराट कोहली आणि दुसरा अफगाणिस्तानचा सुपरस्टार रशीद खान. कोहली दुसऱ्या टी-२०मध्ये भारताकडून खेळताना दिसेल. मात्र रशीद खान संपूर्ण टी-२० मालिकेतून बाहेर आहे.


२०२४ टी-२० विश्वचषकाआधी भारताची ही शेवटची टी-२- मालिका आहे. कर्णधार रोहित शर्मा दीर्घकाळानंतर या फॉरमॅटमध्ये पुनरागमन करत आहे. तो शेवटचा २०२२च्या टी-२० विश्वचषकात खेळला होता.या टी-२० मालिकेनंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. आणि त्यानंतर आयपीएल २०२४चे आयोजन होईल.


टीम इंडियाच संभाव्य प्लेईंग ११ - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन/जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, आवेश खान, कुलदीप यादव/रवि बिश्नोई आणि मुकेश कुमार.


अफगानिस्तान संभाव्य प्लेईंग इलेव्हन- हज़रतुल्लाह ज़ज़ई, रहमानुल्लाह गुरबाज़ (विकेटकीपर), इब्राहिम ज़ादरान (कर्णधार), नजीबुल्लाह ज़ादरान, मोहम्मद नबी, अज़मतुल्लाह उमरज़ई, मुजीब उर रहमान, कैस अहमद, नूर अहमद, नवीन-उल-हक आणि फजलहक फारूकी.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 Ind vs Nam: सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका; बुमराच्या बॉलमुळे ईशान जखमी

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

T20 World Cup 2026 Ind vs Nam: नामिबिया विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माला आराम ?

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

भारतीय संघाचा नामिबियाविरुद्ध सावध पवित्रा

नवी दिल्ली  : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेवर मात केल्यानंतर, भारत आता आपल्या दुसऱ्या

वेस्ट इंडीजचा इंग्लंडवर ३० धावांनी विजय

रदरफोर्डची वादळी फलंदाजी अन् मोटीची 'फिरकी' ठरली निर्णायक मुंबई  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडीजने आपल्या

भारताला मोठा धक्का, नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी महत्त्वाचा खेळाडू रुग्णालयात

मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धचा सामना २९ धावांनी जिंकला. आता गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारताचा सामना नामिबिया

वानिंदू हसरंगा विश्वचषकातून बाहेर

कोलंबो  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीलंकन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य