IND vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या टी-२०मध्ये अशी असू शकते भारताची प्लेईंग ११

मुंबई: आज म्हणजेच नव्या वर्षात २०२४मध्ये पहिल्यांदा टीम इंडिया घरच्या मैदानावर खेळण्यासाठी उतरत आहे. त्यांच्यासमोर अफगाणिस्तानचा संघ आहे. मात्र भारतीय संघ त्यांना हलक्यामध्ये घेणार नाही. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आज मोहाली येथील आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे.


दरम्यान, पहिल्या टी-२०मध्ये दोन स्टार खेळाडू खेळताना दिसणार नाही. पहिला म्हणजे भारताचा विराट कोहली आणि दुसरा अफगाणिस्तानचा सुपरस्टार रशीद खान. कोहली दुसऱ्या टी-२०मध्ये भारताकडून खेळताना दिसेल. मात्र रशीद खान संपूर्ण टी-२० मालिकेतून बाहेर आहे.


२०२४ टी-२० विश्वचषकाआधी भारताची ही शेवटची टी-२- मालिका आहे. कर्णधार रोहित शर्मा दीर्घकाळानंतर या फॉरमॅटमध्ये पुनरागमन करत आहे. तो शेवटचा २०२२च्या टी-२० विश्वचषकात खेळला होता.या टी-२० मालिकेनंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. आणि त्यानंतर आयपीएल २०२४चे आयोजन होईल.


टीम इंडियाच संभाव्य प्लेईंग ११ - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन/जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, आवेश खान, कुलदीप यादव/रवि बिश्नोई आणि मुकेश कुमार.


अफगानिस्तान संभाव्य प्लेईंग इलेव्हन- हज़रतुल्लाह ज़ज़ई, रहमानुल्लाह गुरबाज़ (विकेटकीपर), इब्राहिम ज़ादरान (कर्णधार), नजीबुल्लाह ज़ादरान, मोहम्मद नबी, अज़मतुल्लाह उमरज़ई, मुजीब उर रहमान, कैस अहमद, नूर अहमद, नवीन-उल-हक आणि फजलहक फारूकी.

Comments
Add Comment

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात

भारत वि ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना मेलबर्नमध्ये रंगणार

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळवला

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल