शेअर मार्केटमध्ये रिटर्नच्या नावाने महिलेने गमावले ३.८० कोटी रूपये, ४८ तासांत मुंबई पोलिसांनी मिळवून दिले पैसे

मुंबई: मुंबईच्या सायबर क्राईम पोलिसांच्या(cyber crime police) हाती मोठे यश आले आहे. पोलिसांनी शेअर ट्रेडिंगच्या(share trading) माध्यमातून फसवणूक झालेल्या एका महिलेला तिचे पैसे परत मिळवून दिले. यासाठी पोलिसांनी सलग ४८ तास काम केले आणि आरोपीला अटक केली. आरोपीचे खाते फ्रीज करून पोलिसांनी त्या महिलेला पैसे परत केले.


महिलेची ऑनलाईन फसवणूक झाली होती. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. असे करून आरोपीने महिलेचे ३.८० कोटी रूपये लुबाडले होते.जसे महिलेला फसवणूक झाल्याचे लक्षात आले तसे तिने हेल्पलाईन नंबर १९३०वर कॉल करून आपली तक्रार दाखल केली.


पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला इन्स्टाग्राम स्क्रोल करत होती तेव्हा तिला शेअर मार्केटमध्ये ट्र्रेडिंगसाठी पैसे गुंतवणुकीबाबतची जाहिरात दिसली. महिलेने जसे त्यावर क्लिक केले तसे तिला दुसऱ्या प्रोफाईलवर रिडायरेक्ट करण्यात आले. येथे तिला शेअर मार्केटमधून चांगले रिटर्न देण्याबाबतचे आमिष देण्यात आले. महिलेने एकूण मिळून ४.५६ कोटी रूपये गुंतवले होते. अॅपवर याचे रिटर्न्सही दाखवले जात होते. मात्र ती आपल्या खात्यातून पैसे काढू शकत नव्हती. त्याचवेळेस तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.


पोलिसांच्या माहितीनुसारी आरोपींनी २६ बँकांमधील ७१ बँक खात्यातून १७१ वेळा देवाणघेवाण केली होती. पोलिसांच्या माहितीनुसार अहमदाबाद, नवी मुंबई आणि दुबई येथून पैसे काढण्यात आले होते. पीडित महिलेने ४ ते ६ जानेवारीदरम्यान पैसे गुंतवले होते. तिला ७ जानेवारीला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानतंर तिने १३९० या हेल्पलाईनवर कॉल करून तक्रार केली.

Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता