शेअर मार्केटमध्ये रिटर्नच्या नावाने महिलेने गमावले ३.८० कोटी रूपये, ४८ तासांत मुंबई पोलिसांनी मिळवून दिले पैसे

मुंबई: मुंबईच्या सायबर क्राईम पोलिसांच्या(cyber crime police) हाती मोठे यश आले आहे. पोलिसांनी शेअर ट्रेडिंगच्या(share trading) माध्यमातून फसवणूक झालेल्या एका महिलेला तिचे पैसे परत मिळवून दिले. यासाठी पोलिसांनी सलग ४८ तास काम केले आणि आरोपीला अटक केली. आरोपीचे खाते फ्रीज करून पोलिसांनी त्या महिलेला पैसे परत केले.


महिलेची ऑनलाईन फसवणूक झाली होती. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. असे करून आरोपीने महिलेचे ३.८० कोटी रूपये लुबाडले होते.जसे महिलेला फसवणूक झाल्याचे लक्षात आले तसे तिने हेल्पलाईन नंबर १९३०वर कॉल करून आपली तक्रार दाखल केली.


पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला इन्स्टाग्राम स्क्रोल करत होती तेव्हा तिला शेअर मार्केटमध्ये ट्र्रेडिंगसाठी पैसे गुंतवणुकीबाबतची जाहिरात दिसली. महिलेने जसे त्यावर क्लिक केले तसे तिला दुसऱ्या प्रोफाईलवर रिडायरेक्ट करण्यात आले. येथे तिला शेअर मार्केटमधून चांगले रिटर्न देण्याबाबतचे आमिष देण्यात आले. महिलेने एकूण मिळून ४.५६ कोटी रूपये गुंतवले होते. अॅपवर याचे रिटर्न्सही दाखवले जात होते. मात्र ती आपल्या खात्यातून पैसे काढू शकत नव्हती. त्याचवेळेस तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.


पोलिसांच्या माहितीनुसारी आरोपींनी २६ बँकांमधील ७१ बँक खात्यातून १७१ वेळा देवाणघेवाण केली होती. पोलिसांच्या माहितीनुसार अहमदाबाद, नवी मुंबई आणि दुबई येथून पैसे काढण्यात आले होते. पीडित महिलेने ४ ते ६ जानेवारीदरम्यान पैसे गुंतवले होते. तिला ७ जानेवारीला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानतंर तिने १३९० या हेल्पलाईनवर कॉल करून तक्रार केली.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील