Thackeray Vs Shinde : काहीही झालं तरी प्रकरण सुप्रीम कोर्टात जाऊ शकतं!

विधानसभा अध्यक्षांना निकाल द्यावाच लागेल, पण...


मुंबई : गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढणार्‍या शिवसेनेतील पक्षफुटीवर (Shivsena Split) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) उद्या अंतिम निर्णय देणार आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षात बंड करत काही आमदारांना सोबत घेऊन महाराष्ट्रात केलेल्या जादूमुळे आजवर ठाकरे गटाच्या (Thackeray Group) अनेक बड्या बड्या नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंचे नेतृत्व पत्करले. त्यानंतर या दोन्ही गटातील वाद विकोपाला गेले आणि शिवसेना नेमकी कोणाची हा प्रश्न निर्माण झाला. या ऐतिहासिक राजकीय पेचावर उद्या बुधवारी, १० जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता निकाल दिला जाणार आहे.


शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात दोन्ही गटांच्या याचिकांवर १४ सप्टेंबर ते २० डिसेंबरपर्यंत विधानसभेच्या अध्यक्षांसमोर मॅरेथॉन सुनावणी झाली. त्यानंतर सुमारे ५०० पानांचे निकालपत्र तयार करण्याचे काम सध्या सुरु आहे. विधानसभा अध्यक्ष विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये या निकालाचे वाचन करणार आहेत. मागील सुमारे दीड वर्षांपासून अत्यंत चर्चेच्या आणि राजकीय वादाच्या ठरलेल्या या मुद्द्यावरील निकालाकडे संपूर्ण राज्याचे आणि देशाचेही लक्ष लागले आहे.


आमदार अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात तब्बल १० महिने झालेल्या सुनावणीनंतर १४ मे २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत, पक्ष कोणाचा ते ठरविण्याची तसेच आमदार पात्रता ठरविण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपविली. यानंतर निकालासाठी तारखांमध्ये दोनदा मुदतवाढ करण्यात आली आणि अखेरीस १० जानेवारी ही तारीख देण्यात आली. त्यानुसार आता उद्या हा निकाल लागणार आहे.



काहीही झालं तरी प्रकरण सुप्रीम कोर्टात जाऊ शकतं


तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोणताही स्पष्ट निकाल न देता सर्वोच्च न्यायालयाकडे (Supreme court) प्रकरण वर्ग करण्याचा पर्याय अध्यक्षांकडे नाही. त्यांना एक निकाल द्यावा लागेल. अध्यक्षांनी कोणत्याही बाजूने निकाल दिला तरी ते प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाकडे जाणारच आहे. कारण एक गट नाराज होणारच आहे आणि तो सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेणार आहे. यातला मधला मार्ग काढणे अपेक्षित नाही. त्यांना पात्र किंवा अपात्र ठरवावे लागेल. त्यामुळे आता अध्यक्ष काय निकाल देतात याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

Comments
Add Comment

Rahul Narvekar : शिक्षक केवळ वाचायला शिकवत नाही, तर समाज घडवतो आणि वाचवतो" - राहुल नार्वेकर यांचे गौरवोद्गार

मुंबई : "शिक्षक हा केवळ अक्षरांची ओळख करून देणारा घटक नाही, तर तो खऱ्या अर्थाने समाज घडवणारा आणि संकटाच्या काळात

Mohan Bhagwat : अस्थिर जगाचा आधार केवळ भारतच; पण त्यासाठी शेवटच्या घटकाचा विकास हवा" – डॉ. मोहन भागवत

आदिवासी अस्मिता हीच देशाची ओळख"; कर्मयोगी एकल शिक्षक मेळाव्यात डॉ. मोहन भागवत यांचे प्रेरक उद्गार सत्ता नव्हे, तर

First Tribal University : विदर्भात साकारणार देशातील पहिले आदिवासी विद्यापीठ

५०० कोटींच्या प्रकल्पातून शैक्षणिक क्रांतीचे नवे पर्व मुंबई : गेल्या तीन दशकांपासून आदिवासी आणि दुर्गम भागात

BMC News : मुंबईच्या महापौर रस्ते आणि नालेसफाईच्या पाहणी मोहिमेवर

रस्ते कामांचा वेग वाढवताना बांधकामात आणि दर्जा राखण्यात हयगय नको; प्रशासनाला दिले निर्देश मुंबई : रस्त्यांची

HSC Result : बारावीचा निकाल जाहीर झाला पण टक्क्यांना लागलेली गळती कायम राहिली

मुंबई : महाराष्ट्र उच्च माध्यमिक आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीची

Mumbai Crime : आधी विटेने वार, मग गळा आवळला...वांद्र्यातील ७८ वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या

मुंबई : मुंबईतील वांद्रे (पूर्व) भागात उघडकीस आलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाचा छडा लावण्यात खेरवाडी पोलिसांना