Ravindra Vaikar : अखेर ईडीने घरावर छापेमारी केलीच! ठाकरे गटाचे रवींद्र वायकर सापडले कचाट्यात

वायकरांशी संबंधित आणखी सात ठिकाणांवर ईडीची छापेमारी


मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून जोगेश्वरी (Jogeshwari) येथील भूखंडासंबंधी चर्चेत असलेलं प्रकरण लवकरच निकालात निघणार आहे. या प्रकरणात ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू रवींद्र वायकर (Ravindra Vaikar) कचाट्यात सापडणार आहेत. रवींद्र वायकर यांच्या घरावर आज सकाळी ईडीने छापेमारी (ED raids) केली. ऐन निवडणुकीच्या ठाकरे गटाचा आणखी एक प्रमुख नेता अडचणीत सापडल्याने ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.


जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीने रवींद्र वायकर यांच्या घरी धाड टाकली. आज सकाळी सात वाजल्यापासून ही छापेमारी सुरू होती. ईडीच्या १० ते १२ जणांच्या पथकाने त्यांच्या घरी झाडाझडती सुरू केली. रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब या निवासस्थानासह वायकरांशी संबंधित सात ठिकाणांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून रवींद्र वायकर आणि कुटुंबीयांची कसून चौकशी सुरू आहे. तसेच, काही कागदपत्रं मिळतात का? याची चाचपणी केली जात आहे.


जोगेश्वरी भागात मुंबई महापालिकेच्या राखीव भूखंडावर रवींद्र वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधलं व त्याची परवानगी त्यांनी पालिकेकडून घेतली नव्हती, असा आरोप त्यांच्यावर आहे. हा सुमारे ५०० कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हा आरोप केला होता. सप्टेंबर महिन्यात या प्रकरणी कारवाई करत ईडीने वायकरांसह त्यांची पत्नी व इतर सहा संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. यानंतर पुढील कारवाई करत ईडीने वायकर यांच्याविरोधात केस दाखल केली. आता ईडीच्या छापेमारीतून काय पुढे येणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य