Unseasonal Rain : कोकणात अवकाळीमुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ!

पुढील २४ तास राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता


मुंबई : देशभरात सगळीकडे कडाक्याची थंडी (Cold) पसरली आहे. मुंबईला (Mumbai) देखील यंदा थंडीचा तडाखा बसला आहे. मात्र, काही राज्यांत अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) लावलेल्या हजेरीमुळे शेतकऱ्यांना (Farmers) पुन्हा एकदा नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. कोकणात देखील अवकाळी पावसाने ऐन फुलोऱ्यावर आलेल्या आंबा, काजूच्या पिकांचे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. खराब हवामानामुळे खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामातील पिके मोठ्या प्रमाणात वाया गेली. यानंतर आता पुन्हा एकदा अवकाळीच्या हजेरीमुळे बळीराजाच्या समस्या संपत नसल्याचे चित्र आहे.


अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणात अवकाळी पाऊस सुरु आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात काल अवकाळी पाऊस पडला. सिंधुदुर्गात आजही सर्वत्र पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. तर दुसरीकडे अवकाळीमुळे किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यताही वाढली आहे.



स्ट्रॉबेरीच्या पिकावर रोग पडण्याची शक्यता


रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, संगमेश्वर भागांत रिमझिम पाऊस सुरु आहे. जोरदार पावसामुळे तालुक्यातील काही गावांतील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. सकाळी महाबळेश्वर परिसरात एक तास तुरळक पाऊस पाहायला मिळाला. अवकाळी पावसाचा स्ट्रॉबेरी पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. स्ट्रॉबेरीवर काळे डाग आणि रोग पडण्याची दाट शक्यता असल्याने बळीराजाचं टेन्शन वाढलं आहे.



पावसाने दोडामार्ग तालुक्याला झोडपले


सिंधुदुर्गात सावंतवाडी आणि कणकवली तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाचा तडाखा दिसून येत आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दोडामार्ग तालुक्याला झोडपून काढलं. दोडामार्ग तालुक्यात सोमवारी रात्रीपासून अवकाळी पाऊस सुरू आहे.



राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता


पुढील २४ तास कोकणासह राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात आज विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून नाशिक, जळगाव, औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


Comments
Add Comment

Coronation of Shivaji Maharaj : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे'

रायगड : दुर्गराज रायगडावर तिथीनुसार २७ जून २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला

Mantri Nitesh Rane : कोकणातील तीर्थस्थळे जलमार्गांनी जोडणार!

मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; आंगणेवाडी, कुणकेश्वर, गणपतीपुळे, पाली बल्लाळेश्वर मंदिराचा समावेश मुंबई :

Narendra Modi : सिंधुदुर्ग आणि नाशिक जागतिक पर्यटन स्थळे म्हणून विकसित करणार!

नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडला रोडमॅप; २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार