Narayan Rane : उद्धव ठाकरेंनी सिंधुदुर्गाला, कोकणाला काय दिलं? फक्त यायचं, मासे खायचं आणि जायचं!

ठाकरेंमध्ये आक्रमकता होती तर नारायण राणे, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे यांची गरज काय होती?


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची सणसणीत टीका


सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरबंजारा समाजाच्या दोन हजार कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. यावेळी माजी भाजप खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) , आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्यावर सडकून टीका केली. वैभव नाईक यांनी गोरबंजारा समाजाला भाजपमध्ये जाऊ नये यासाठी धमकी दिली असा आरोप नारायण राणे आणि निलेश राणे यांनी केला. आमच्या विरोधात असलेल्या पक्षांची लोकांना रोजगार निर्मिती करून द्यायची ताकद आहे का असा सवालही त्यांनी विचारला.


नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी फक्त टीका करण्याची कामं केली. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी सिंधुदुर्गाला, कोकणाला काय दिलं? विकासाला पुरेसे पैसे देखील दिले नाहीत. कोकणात यायचं, मासे खायचं आणि जायचं एवढंच काम त्यांनी केलं. आक्रमकता आणि उद्धव, आदित्य ठाकरे यांचा संबंध काय? ठाकरे यांच्यात आक्रमकता होती तर नारायण राणे, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे यांची गरज काय होती? बाळासाहेब ठाकरे गेले आणि शिवसेना संपली अशी जोरदार टीका त्यांनी केली.


ठाकरे गटाचे आमदार वैभव राणे यांच्यावर टीका करताना नारायण राणे म्हणाले की, राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक हे गोरबंजारा समाजाचे होते. मात्र वैभव नाईक यांचं नाव न घेता त्यांच्यावर राणे यांनी टीका केली. ते म्हणाले की, तो एक नाईक तुमच्या समाजाचा नाही. नऊ वर्षात काही काम केलं नाही. जिल्हा, राज्य आणि देशाच्या दृष्टीने वैभव नाईक या विद्वानाने कोणते विचार दिले? सभागृहात कधी उठून बोलला नाही, कारण त्याचे वजन एवढं आहे की त्याला उठता येत नाही. यापुढे गोरबंजारा समाजाला धमकी दिल्यास राणेशी गाठ आहे, असा इशारा नारायण राणे यांनी दिला.



निलेश राणे यांनीही केली वैभव नाईकांवर टीका


माजी खासदार निलेश राणे म्हणाले की, या कार्यक्रमाला विरोध झालाय. ८० वर्षाच्या एका माणसाने धमकी दिली. त्याने खरा आशीर्वाद देणे आवश्यक होते. मात्र तुम्हाला दिलेली धमकी म्हणजे आम्हाला धमकी दिली. आमचा पुनर्जन्मावर विश्वास नाही, आम्ही हिशेब याच जन्मात चुकता करतो. आम्ही राणे आहोत. गोरबंजारा समाजाला आमदार वैभव नाईक यांनी ऑफर दिली. मात्र ती या समाजाने धुडकावून लावली. आम्ही दुसऱ्यांच्या तुकड्यांवर जगत नाही. जर पुन्हा त्यांनी धमकी दिली तर तुम्ही फक्त मला कॉल करा, मी पुढचे काय ते बघतो. तुमच्याबरोबर राणे कुटुंबीय कायम आहेत, असं निलेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

Kokan Railway trains : कोकण रेल्वेच्या पाच गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा मिळण्याची शक्यता!

रत्नागिरी : कोकण रेल्वेसंदर्भात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक

​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान सावंतवाडी :

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक