Weight loss: वजन कमी करायचे आहे तर इतके प्या पाणी, पाहता पाहता व्हाल स्लिम ट्रिम

  83

मुंबई: आजकाल वाढते वजन हे अनेक समस्यांचे कारण बनत आहे. लोक आपले वजन कमी करण्यासाठी विविध पद्धती वापरतात. मात्र यानंतरही वजन कमी होत नाही. फार कमी लोक जणातात की पाण्यामुळे केवळ तहानच भागत नाही तर वजनही कमी होते. पाणी शरीराला योग्य पद्धतीने काम करण्यास मदत करता. यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहते तसेच पचनापासून ते मेटाबॉलिज्मवरही परिणाम होतो. जाणून घ्या पाणी कशा पद्धतीने वजन कमी करण्यास मदत करतात.



जास्त भूक लागत नाही


अनेकदा जेव्हा आपण पुरेसे पाणी पीत नाही तेव्हा शरीर याचे संकेत देऊ लागते. यामुळे भूक लागते मात्र खरंतर भूक लागलेली नसते. असे जाणवल्याने लोक अधिक जेवतात. अशातच जेव्हा आपण पुरेसे पाणी पितो तेव्हा अधिक खाल्ले जात नाही. ओव्हरईटिंगपासून आपण वाचतो.



टॉक्सिन्स शरीरातून बाहेर निघतात


पाणी शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करतात. पाण्यामुळे आपले शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्सिफाय होते आणि युरिनमधून विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम केले जाते. यामुळे शरीर योग्य पद्धतीने काम करते. यामुळे वजन कमी करण्यासही मदत होते.



कॅलरी फ्री


अनेकदा तहान लागली की आपण हाय कॅलरी ड्रिंक्स अथवा सॉफ्ट ड्रिंक पितो यात मोठ्या प्रमाणात शुगर तसेच कॅलरीज असतात. मात्र पाण्यमध्ये शून्य कॅलरीज असतात. पाण्यामुळे तहानही भागली जाते.



मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यास मदत


पाणी पुरेसे प्यायल्याने मेटॉबॉलिज्म बूस्ट होण्यास मदत होते. जेव्हा बॉडी योग्य पद्धतीने हायड्रेट होते तेव्हा पोषकतत्वे शरीरात योग्य पद्धतीने शोषली जातात. यामुळे एक्स्ट्रा कॅलरी बर्न होते.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी