Team india: अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित शर्मा कर्णधार

मुंबई: अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मालिकेसाठी रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. तर विराट कोहलीचेही टी-२० फॉरमॅटमध्ये पुनरागमन झाले आहे.


कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने बीसीसीआयला सूचित केले होते की ते टी-२० निवडीसाठी उपलब्ध आहेत. अशातच दोन्ही खेळाडूंकडे दुर्लक्ष करणे कठीण होते. रोहित शर्मा सध्या तीनही फॉरमॅटसाठी टीम इंडियाचा अधिकृत कर्णधार आहे. मात्र तो आणि विराट कोहलीने गेल्या एका वर्षापासून एकही टी-२० सामना खेळलेला नाही.



सिराज आणि बुमराहला आराम


अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवडत समितीने वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहला आराम दिला आहे. सिराज आणि बुमराहने केपटाऊनमधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील विजयात महत्त्वाचे योगदान दिले होते. दोन्ही वेगवान गोलंदाज आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळण्यासाठी उतरणार आहेत.


भारतीय संघ आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिकेतील पहिला सामना ११ जानेवारीला मोहालीत होईल. त्यानंतर दुसरा टी-२० सामना १४ जानेवारीला इंदौरमध्ये खेळवला जाईल. त्यानंतर बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये शेवटचा टी-२० सामना १७ जानेवारीला होईल.



अफगाणिस्तान मालिकेसाठी टीम इंडिया


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयसवाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, आवेश खान आणि मुकेश कुमार.

Comments
Add Comment

BCCI च्या कुटुंबातील कोणीही मेलं नाही, म्हणून..., शुभम द्विवेदीच्या पत्नीची प्रतिक्रिया

"सामान्य लोक माझं ऐकतील आणि सामन्यावर बहिष्कार टाकतील" ऐशन्या द्विवेदी Asia Cup 2025 India Vs Pak Match Controversy: पहलगाम हल्ल्यात

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई

क्रिकेटमध्ये पाकिस्तानशी तर हॉकीमध्ये चीनशी... रविवारी भारताची दुहेरी 'कसोटी'!

उद्याचा रविवार क्रीडाप्रेमींसाठी दुहेरी थरार, हॉकी आणि क्रिकेटचे दोन्ही सामने महत्वाचे! नवी दिल्ली: उद्या दि. १४

जर्सीचे प्रायोजक १५-२० दिवसांत निश्चित होणार: राजीव शुक्ला

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट जर्सीला प्रायोजक मिळण्यासाठी आणखी २ ते ३ आठवड्यांची वाट पाहवी लागणार आहे, असे

जागतिक प्रत्यारोपण क्रीडास्पर्धेत ईशान आणेकरचे घवघवीत यश

जलतरणात दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदकाची कमाई ठाणे : अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती, दाते यांच्यासाठी होणार्या

बॅडमिंटनमध्ये २५ सेकंदांची ‘टाईम-क्लॉक’ प्रणाली लागू

नवी दिल्ली : बॅडमिंटन सामन्यांना अधिक वेग देण्यासाठी, खेळाची जागतिक नियामक संस्था ‘बीडब्ल्यूएफ’ने (बॅडमिंटन