Solapur News : आपल्या देशात रेल्वे आणि सैन्याची नाही तेवढी जमीन वक्फ बोर्डाची!

सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चादरम्यान नितेश राणे यांची सडकून टीका


मोर्चात दगडफेक प्रकरणी एकजण ताब्यात


सोलापूर : सोलापुरात काल हिंदू जन आक्रोश मोर्चाचं (Hindu Jan Akrosh Morcha) आयोजन करण्यात आलं होतं. त्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमामध्ये भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि तेलंगणातील भाजप आमदार टी राजा सिंह (T Raja Singh)यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी मुस्लिमांना मालमत्तेविषयी अमर्याद अधिकार देणाऱ्या वक्फ बोर्डावर (WAQF Board) नितेश राणे यांनी सडकून टीका केली.


नितेश राणे म्हणाले की, "वक्फ कायदा हा केवळ आपल्या देशात आहे, असा कायदा कोणत्याही इतर समाजासाठी नाही, इतकंच काय कुठल्याही इस्लामिक देशात ही कायदा नाही. आपल्या देशात जेवढी जमीन रेल्वे आणि सैन्याची नाही तेवढी जमीन वक्फ बोर्डाने घेऊन ठेवली आहे. देशातील तिसऱ्या क्रमांकाची जमीन कोणाकडे असेल तर ती वक्फची आहे. जिथे अशी जमीन वक्फची म्हणून मागायला येतील तिथे तुम्ही विरोध करून उभे राहिला तर राज्य आणि केंद्र सरकार तुमच्या मागे राहिल", असा विश्वास नितेश राणे यांनी दिला.


वक्फ म्हणजे काय?


कोणतीही जमीन वक्फ (WAQF) होणे म्हणजे त्यावर कोणाचाही मालकी हक्क नाही. अशा स्थितीत ती जमीन वक्फ बोर्डाची मालमत्ता बनते आणि नंतर ती सार्वजनिक कामांसाठी वापरली जाते. एवढेच नाही तर, एखादी मालमत्ता वक्फ झाल्यानंतर ती पुन्हा खाजगी होऊ शकत नाही. तुमची मालमत्ता वक्फची आहे आणि तुमची नाही, असे वक्फ बोर्डाने सांगितले तर तुम्ही न्यायालयातही जाऊ शकत नाही. कोणताही मुस्लिम त्याच्या कोणत्याही मालमत्तेला वक्फ करू शकतो.



मोर्चात दगडफेक प्रकरणी एकजण ताब्यात


मोर्चादरम्यान सोलापुरात काही दुकानांवर दगडफेक करून तोडफोड करण्यात आली. दुकानांवर दगडफेकीच्या घटनेमध्ये दुकानातील साहित्याचे नुकसान झाले असून एक व्यक्ती किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. या तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे, तर एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. मोर्चाच्या वेळेस पोलिसांनी या परिसरात कॅमेरे लावलेले होते. त्यामुळे फुटेज पाहून आणखी आरोपी निश्चित केले जाणार आहेत.


Comments
Add Comment

पंतप्रधान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी; अतिवृष्टीच्या संकटावर पंतप्रधानांचे फडणवीसांना आश्वासन

पंतप्रधानांचा मुंबई दौरा आणि नवी मुंबई विमानतळाचे नामकरणही होणार पूरस्थिती, संरक्षण कॉरिडॉर आणि 'पोलाद सिटी'सह

पुण्याचा पालकमंत्री होण्याचं स्वप्न पाहणाऱ्याला मीच पाडलं: अजित पवारांचा टोला

तुम्हाला कळतं का ? मागचा अजित पवार आणि आताचा अजित पवार फार फरक झालाय - पुण्यात अजितदादांची जोरदार फटकेबाजी पुणे :

अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी भाऊबीज भेट; महाराष्ट्र सरकारने केले ४०.६१ कोटी मंजूर

मुंबई: महाराष्ट्र सरकारने एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना २,००० ची

Red Alert : २४ तासांत पुन्हा मुसळधार! धाराशिव जिल्ह्यांसाठी पुढील २४ तास धोक्याचे, हवामान खात्याचा इशारा

सोलापूर : मराठवाडा विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या

धाराशिवला पुराचा फटका पण जिल्हाधिकाऱ्याला थिरकण्याचा मोह आवरेना

धाराशिव : मराठवाड्यातील नांदेड, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. मुसळधार

मान्सूनचा मुक्काम लांबणीवर!

मराठवाड्यासह विदर्भात अस्मानी संकट आणखी गडद होणार मुंबई : पावसाने राज्यभरात धुमाकूळ घातलेला असतानाच जाता-जाता