Health: या छोट्या बिया मोठ्या कामाच्या, महिलांनी थंडीत जरूर करावे याचे सेवन

  63

मुंबई: तीळ आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात. तिळाचे सेवन थंडीमध्ये केले जाते. कारण तीळ हे उष्ण असतात. थंडीच्या दिवसांत लोक तिळाचे लाडू, हलवा बनवून खातात. यात अनेक प्रकारची पोषकतत्वे असतात जसे कॅल्शियम, आर्यन, पोटॅशियम, प्रोटीन, व्हिटमीन ए, सी आणि सोडियम आढळतात.


महिलांनी तिळाचे सेवन जरूर करावे. यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांपासून सुटका होते. जाणून घेऊया तिळाचे फायदे


हाडे मजबूत बनतात- तीळामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. याचे सेवन केल्याने हाडाच्या सर्व समस्या दूर होतात. याचे सेवन केल्याने शरीराचा थकवा दूर होतो.


अनियमित पीरियडची समस्या होते दूर - अनेक महिलांमध्ये अनियमित पाळीचा त्रास असतो. याचे मुख्य कारण खराब लाईफस्टाईल. तिळाचे सेवन केल्याने या समस्येपासून सुटका मिळते. तिळामध्ये फॅटी अॅसिड असतात जे पीरियड्स रेग्युलर करण्यास मदत करतात.


हार्मोन्स नियंत्रित ठेवतात - तिळामध्ये व्हिटामिन सी आढळते जे शरीरात अॅस्ट्रोजनची पातळी वाढवतात. तीळमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट आणि अँटी बॅक्टेरियलही गुण आढळतात. यामुळे हार्मोन्स नियंत्रित राखण्याचे काम होते.


त्वचेसाठी फायदेशीर - तीळ हे त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहेत. याच्या मदतीने त्वचेला जरूरी पोषण मिळते. यामुळे शरीरात ओलावा कायम राहतो.


एनर्जी वाढते - महिला दिवसभर काही ना काही काम करत असतात ज्यामुळे त्याच्या शरीरात एनर्जीची कमतरता होते अशातच तिळाचे सेवन रोज केल्यास शरीरात एनर्जी वाढते.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी