Health: या छोट्या बिया मोठ्या कामाच्या, महिलांनी थंडीत जरूर करावे याचे सेवन

मुंबई: तीळ आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात. तिळाचे सेवन थंडीमध्ये केले जाते. कारण तीळ हे उष्ण असतात. थंडीच्या दिवसांत लोक तिळाचे लाडू, हलवा बनवून खातात. यात अनेक प्रकारची पोषकतत्वे असतात जसे कॅल्शियम, आर्यन, पोटॅशियम, प्रोटीन, व्हिटमीन ए, सी आणि सोडियम आढळतात.


महिलांनी तिळाचे सेवन जरूर करावे. यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांपासून सुटका होते. जाणून घेऊया तिळाचे फायदे


हाडे मजबूत बनतात- तीळामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. याचे सेवन केल्याने हाडाच्या सर्व समस्या दूर होतात. याचे सेवन केल्याने शरीराचा थकवा दूर होतो.


अनियमित पीरियडची समस्या होते दूर - अनेक महिलांमध्ये अनियमित पाळीचा त्रास असतो. याचे मुख्य कारण खराब लाईफस्टाईल. तिळाचे सेवन केल्याने या समस्येपासून सुटका मिळते. तिळामध्ये फॅटी अॅसिड असतात जे पीरियड्स रेग्युलर करण्यास मदत करतात.


हार्मोन्स नियंत्रित ठेवतात - तिळामध्ये व्हिटामिन सी आढळते जे शरीरात अॅस्ट्रोजनची पातळी वाढवतात. तीळमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट आणि अँटी बॅक्टेरियलही गुण आढळतात. यामुळे हार्मोन्स नियंत्रित राखण्याचे काम होते.


त्वचेसाठी फायदेशीर - तीळ हे त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहेत. याच्या मदतीने त्वचेला जरूरी पोषण मिळते. यामुळे शरीरात ओलावा कायम राहतो.


एनर्जी वाढते - महिला दिवसभर काही ना काही काम करत असतात ज्यामुळे त्याच्या शरीरात एनर्जीची कमतरता होते अशातच तिळाचे सेवन रोज केल्यास शरीरात एनर्जी वाढते.

Comments
Add Comment

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे