Health: या छोट्या बिया मोठ्या कामाच्या, महिलांनी थंडीत जरूर करावे याचे सेवन

  60

मुंबई: तीळ आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात. तिळाचे सेवन थंडीमध्ये केले जाते. कारण तीळ हे उष्ण असतात. थंडीच्या दिवसांत लोक तिळाचे लाडू, हलवा बनवून खातात. यात अनेक प्रकारची पोषकतत्वे असतात जसे कॅल्शियम, आर्यन, पोटॅशियम, प्रोटीन, व्हिटमीन ए, सी आणि सोडियम आढळतात.


महिलांनी तिळाचे सेवन जरूर करावे. यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांपासून सुटका होते. जाणून घेऊया तिळाचे फायदे


हाडे मजबूत बनतात- तीळामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. याचे सेवन केल्याने हाडाच्या सर्व समस्या दूर होतात. याचे सेवन केल्याने शरीराचा थकवा दूर होतो.


अनियमित पीरियडची समस्या होते दूर - अनेक महिलांमध्ये अनियमित पाळीचा त्रास असतो. याचे मुख्य कारण खराब लाईफस्टाईल. तिळाचे सेवन केल्याने या समस्येपासून सुटका मिळते. तिळामध्ये फॅटी अॅसिड असतात जे पीरियड्स रेग्युलर करण्यास मदत करतात.


हार्मोन्स नियंत्रित ठेवतात - तिळामध्ये व्हिटामिन सी आढळते जे शरीरात अॅस्ट्रोजनची पातळी वाढवतात. तीळमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट आणि अँटी बॅक्टेरियलही गुण आढळतात. यामुळे हार्मोन्स नियंत्रित राखण्याचे काम होते.


त्वचेसाठी फायदेशीर - तीळ हे त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहेत. याच्या मदतीने त्वचेला जरूरी पोषण मिळते. यामुळे शरीरात ओलावा कायम राहतो.


एनर्जी वाढते - महिला दिवसभर काही ना काही काम करत असतात ज्यामुळे त्याच्या शरीरात एनर्जीची कमतरता होते अशातच तिळाचे सेवन रोज केल्यास शरीरात एनर्जी वाढते.

Comments
Add Comment

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर

आयोडीन युक्त मिठाचा वापर करा, आरोग्य विभागाचे आवाहन

मुंबई: जागतिक थायरॉईड दिवस दरवर्षी २५ मे रोजी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश थायरॉईड रोगांबद्दल जागरूकता वाढवणे