Delhi School : दिल्लीत थंडीमुळे पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढील पाच दिवस सुट्टी

नवी दिल्ली : यंदाच्या वर्षी सर्वच राज्यांना थंडीचा तडाखा (Winter season) बसला आहे. इतर वर्षांच्या तुलनेत यावेळेस मुंबईतही (Mumbai) तापमान प्रचंड कमी झाले आहे. त्यामुळे मुंबईकरांना अखेरीस थंडी अनुभवायला मिळत आहे. तर दुसरीकडे उत्तरेकडील राज्ये पार गारठली आहेत. दिल्लीमध्ये वाढती थंडी आणि धुक्यामुळे पाचव्या इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढील पाच दिवस सुट्टी घोषित करण्यात आली आहे. दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी यांनी याबाबत माहिती दिली.


दिल्लीच्या शिक्षण मंत्रालयाने काल शनिवारी दिलेल्या सूचनेनुसार शाळांच्या सुट्ट्या १० जानेवारीपर्यंत वाढवण्यात आल्या होत्या. मात्र या आदेशात त्रुटी असल्याचं सांगत काल रात्री हा आदेश मागे घेण्यात आला. त्यानंतर आता सोमवारी शाळा सुरू होणार अशी चिन्हं दिसत होती. आतिशी यांनी दिलेल्या नव्या आदेशानुसार आता सोमवारपासून केवळ सहावीपासून पुढचे वर्ग सुरू होणार आहेत. पाचवीपर्यंतच्या वर्गांना आणखी पाच दिवस सुट्टी असणार आहे.


दिल्लीमध्ये सध्या थंडीची लाट आली असून, पुढील काही दिवस दाट धुकं राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासोबतच दिल्ली परिसरात हलका पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवण्यात येतो आहे. या सर्व शक्यतांमुळे दिल्लीमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

फ्लाइट तिकीट रद्द करण्यावर आता शुल्क लागणार नाही; डीजीसीएने केला रिफंड नियमांमध्ये मोठा बदल

नवी दिल्ली :  विमान प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता विमान प्रवाशांना प्रवासी बुकिंगच्या ४८ तासांच्या

R. Nallakannu : तामिळनाडूतील सीपीआय नेते स्वातंत्र्यसैनिक नल्लाकन्नू यांचे १०१ व्या वर्षी निधन

स्वातंत्र्यसैनिक आणि तामिळनाडूमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते आर. नल्लाकन्नू यांचे

PM Modi Israel Visit : इस्रायलच्या संसदेकडून पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च बहुमान

- हा बहुमान मिळणारे ठरले पहिले भारतीय पंतप्रधान तेल अवीव : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार २५ फेब्रुवारी रोजी

Odisha News : भ्रष्टाचाराविरोधी मोठी कारवाई! खाण अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ४ कोटींची रोकड जप्त

ओडिशा : भ्रष्टाचाराविरोधातील कारवायांमध्ये ओडिशा राज्यात मोठी धडक कारवाई समोर आली आहे. ओडिशा दक्षता विभागाने

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरमालक-भाडेकरूंसाठी 'हे' नवे नियम लागू

नवी दिल्ली : कर वजावटीत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट दावे रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्राप्तिकर

EPFO 3.0: PF क्लेम आता 3 दिवसांत पूर्ण होणार, कसं ते जाणून घेऊया...

नवी दिल्ली: देशातील लाखो नोकरदारांसाठी श्रम मंत्रालयाने 'EPFO 3.0' ही अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना सुरू केली