INDW vs AUSW: पहिल्या टी-२०मध्ये भारताचा धमाकेदार विजय, ऑस्ट्रेलियाला ९ विकेटनी हरवले

मुंबई: भारताच्या महिला संघाने(indian women team) पहिल्या टी-२०मध्ये ऑस्ट्रेलियावर दमदार विजय मिळवला आहे. आधी तितस साधूने भारतासाठी चार विकेट घेतल्या. यानंतर फलंदाजी स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी कमाल करताना भारताला ९ विकेटनी विजय मिळवून दिला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. यात भारताने १७.४ षटकांत १ विकेट गमावत विजय आपल्या नावे केला.


भारतासाठी शेफाली वर्माने ६ चौकार आणि ३ षटकार लगावत ४४ धावा केल्या. याशिवाय स्मृती मंधानाने ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५४ धावा केल्या. सामन्यात भारताने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा बॅटिंगसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव १९.२ षटकांत १४१ धावांवर आटोपला. कांगारूच्या संघासाठी फोएबे लिचफील्डने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. भारतासाठी तितस साधूने सर्वाधिक ४ विकेट मिळवल्या.


या दरम्यान तिने ४ षटकांत ४.२०च्या इकॉनॉमीने १७ धावा खर्च केल्या. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघासाठी स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी शानदार बॅटिंग करत सामना एकतर्फी केला.



भारताने सहज गाठले लक्ष्य


१४२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतासाठी स्मृती मंधाना आणि शेफाली वर्माने पहिल्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी १६व्या षटकांत तुटली. मंधानाने ५२ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकार लगावत ५४ धावा केल्या. याशिवाय सहकारी सलामीवीर शेफाली वर्माने ४४ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकार ठोकत ६४ धावांची नाबाद खेळी केली.

Comments
Add Comment

'सूर्या'सेनेचा विजयाचा श्रीगणेश, पहिल्याच सामन्यात अमेरिकेला चारली धूळ

मुंबई : टी-२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाने आपल्या घरच्या मैदानावर अमेरिकेचा २९ धावांनी पराभव

सूर्यकुमारने टी ट्वेंटी विश्वचषकात केला मोठा विक्रम

मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात २० षटकांत नऊ बाद १६१ धावा केल्या आहेत. अभिषेक शर्माने शून्य, ईशान

अमेरिकेच्या एका गोलंदाजासमोर ढेपाळली भारताची फलंदाजी

मुंबई : टी ट्वेंटी विश्वचषकातील अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात भारताची फलंदाजी एका गोलंदाजासमोर पुरती ढेपाळली.

प्रहार टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धा २०२६

प्रहार टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धा २०२६ या आर्टिकलमध्ये दिलेला क्यूआर कोड (QR Code) स्कॅन करा. दिलेल्या प्रश्नाला

सलामीवीर अभिषेक शर्मा केला भलताच विक्रम

मुंबई : टी ट्वेंटी विश्वचषकातील भारताचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक

टी-२० विश्वचषक: वेस्ट इंडीजची विजयी सलामी, शेफर्ड आणि हेटमायर चमकले

कोलकाता : दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडीज संघाने आपल्या टी-२० विश्वचषक २०२६ मोहिमेची दणक्यात सुरुवात केली