INDW vs AUSW: पहिल्या टी-२०मध्ये भारताचा धमाकेदार विजय, ऑस्ट्रेलियाला ९ विकेटनी हरवले

मुंबई: भारताच्या महिला संघाने(indian women team) पहिल्या टी-२०मध्ये ऑस्ट्रेलियावर दमदार विजय मिळवला आहे. आधी तितस साधूने भारतासाठी चार विकेट घेतल्या. यानंतर फलंदाजी स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी कमाल करताना भारताला ९ विकेटनी विजय मिळवून दिला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. यात भारताने १७.४ षटकांत १ विकेट गमावत विजय आपल्या नावे केला.


भारतासाठी शेफाली वर्माने ६ चौकार आणि ३ षटकार लगावत ४४ धावा केल्या. याशिवाय स्मृती मंधानाने ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५४ धावा केल्या. सामन्यात भारताने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा बॅटिंगसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव १९.२ षटकांत १४१ धावांवर आटोपला. कांगारूच्या संघासाठी फोएबे लिचफील्डने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. भारतासाठी तितस साधूने सर्वाधिक ४ विकेट मिळवल्या.


या दरम्यान तिने ४ षटकांत ४.२०च्या इकॉनॉमीने १७ धावा खर्च केल्या. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघासाठी स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी शानदार बॅटिंग करत सामना एकतर्फी केला.



भारताने सहज गाठले लक्ष्य


१४२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतासाठी स्मृती मंधाना आणि शेफाली वर्माने पहिल्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी १६व्या षटकांत तुटली. मंधानाने ५२ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकार लगावत ५४ धावा केल्या. याशिवाय सहकारी सलामीवीर शेफाली वर्माने ४४ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकार ठोकत ६४ धावांची नाबाद खेळी केली.

Comments
Add Comment

आयपीएलमध्ये विदेशी खेळाडूंना मिळणार केवळ १८ कोटीच!

लिलावापूर्वीच बीसीसीआयच्या नियमांचा अनेक खेळाडूंना फटका मुंबई  : आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावाची सध्या तयारी

इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची विराटला ७ वर्षांनी संधी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ६ डिसेंबर

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर