भारतीय नौदलाची धाडसी कारवाई, अपहरण झालेल्या जहाजातून १५ भारतीयांची सुटका

नवी दिल्ली: भारतीय नौदलाने(indian navy) शुक्रवारी धाडसी कारवाई करताना सोमालियाजवळ अपहरण करण्यात आलेल्या एमव्ही लीला नारफॉक या जहाजावरील १५ भारतीयांना सुखरूप सोडवले. समुद्री चाच्यांकडून या जहाजाचे अपहरण करण्यात आले होते मात्र भारताच्या नौदलाने धडाकेबाज कारवाई करताना या जहाजावरील १५ भारतीयांची सुखरूप सुटका केली तसेच इतर सहा क्रू कर्मचाऱ्यांचीही सुटका करण्यात आली.


 


नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर अरबी समुद्रात एमव्ही लीला नॉरफोक या जहाजाचे अपहरण झाल्याची माहिती भारतीय नौदलाला मिळाली. त्यानंतर तातडीने ही कारवाई करण्यात आली. भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी या अपहरण कर्त्यांविरोधात कारवाईचे आदेश भारताच्या युद्धनौकांना दिले. त्यानंतर येथील जहाजावरील १५ भारतीयांसह २१ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. नौदलाच्या मार्कोस कमांडर्सकडून ही कारवाई करण्यात आली.


 


दरम्यान, जहाजावर शोधमोहीम घेतली असताना नौदलाला येथे समुद्री चाचे आढळले नाहीत. या चाच्यांनी जहाजावर गोळीबार केला आणि त्यानंतर ते आश्रय घेऊन लपून बसले होते अशी माहिती सुटका झालेल्या सदस्यांनी दिली.

Comments
Add Comment

रेल्वेतून उतरल्यानंतर घरी जाण्यासाठी ई - बाईक !

रेल्वेची रस्त्यावरही सेवा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने काही प्रमुख स्थानकांवर ई-बाईक भाड्याने देण्याची सेवा

राज्यात थंडीच्या कडाक्यात वाढ

मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट नवी दिल्ली : उत्तरेकडून शीत लहरी महाराष्ट्राकडे वेगाने येत

राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित

काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकांना वारंवार गैरहजर नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरम येथील

‘मनरेगा’ नव्हे, आता ‘पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना’

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत ग्रामीण रोजगाराबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेताना

देशात २०२७ मध्ये डिजीटल जनगणना

११ हजार ७१८ कोटी रुपयांची तरतूद दोन टप्प्यांत होणार जनगणना एप्रिल ते डिसेंबर सात महिन्यांचा कालावधी

धीरेंद्र शास्त्री करणार भुतांवर पीएचडी ; भुतांवर उच्च शिक्षणाची दारे खुली ?

बागेश्वर धाम : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी उच्च शिक्षणाची इच्छा व्यक्त करत