भारतीय नौदलाची धाडसी कारवाई, अपहरण झालेल्या जहाजातून १५ भारतीयांची सुटका

नवी दिल्ली: भारतीय नौदलाने(indian navy) शुक्रवारी धाडसी कारवाई करताना सोमालियाजवळ अपहरण करण्यात आलेल्या एमव्ही लीला नारफॉक या जहाजावरील १५ भारतीयांना सुखरूप सोडवले. समुद्री चाच्यांकडून या जहाजाचे अपहरण करण्यात आले होते मात्र भारताच्या नौदलाने धडाकेबाज कारवाई करताना या जहाजावरील १५ भारतीयांची सुखरूप सुटका केली तसेच इतर सहा क्रू कर्मचाऱ्यांचीही सुटका करण्यात आली.


 


नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर अरबी समुद्रात एमव्ही लीला नॉरफोक या जहाजाचे अपहरण झाल्याची माहिती भारतीय नौदलाला मिळाली. त्यानंतर तातडीने ही कारवाई करण्यात आली. भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी या अपहरण कर्त्यांविरोधात कारवाईचे आदेश भारताच्या युद्धनौकांना दिले. त्यानंतर येथील जहाजावरील १५ भारतीयांसह २१ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. नौदलाच्या मार्कोस कमांडर्सकडून ही कारवाई करण्यात आली.


 


दरम्यान, जहाजावर शोधमोहीम घेतली असताना नौदलाला येथे समुद्री चाचे आढळले नाहीत. या चाच्यांनी जहाजावर गोळीबार केला आणि त्यानंतर ते आश्रय घेऊन लपून बसले होते अशी माहिती सुटका झालेल्या सदस्यांनी दिली.

Comments
Add Comment

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी