Economy : चीनपेक्षा भारताची अर्थव्यवस्था सुस्थितीत : संयुक्त राष्ट्र

नवी दिल्ली : जगातील अर्थव्यवस्थेत (economy) भारताचे महत्त्वपूर्ण योगदान असून संयुक्त राष्ट्रांच्या मते, देशांतर्गत उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील चांगल्या मागणीमुळे भारताचा विकास दर २०२४ मध्ये ६.२ टक्के असेल असा अंदाज आहे.


World Economic Situation and Prospects (WESP) 2024 च्या अहवालात म्हटले आहे की, दक्षिण आशियाचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) २०२४ मध्ये ५.२ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. तर या अहवालानुसार, २०२५ मध्ये भारताचा जीडीपी ६.६ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.


तसेच उत्पादन आणि सेवा क्षेत्रात चांगली देशांतर्गत मागणी आणि विकास दर कायम राहील, असे अहवालात म्हटले आहे. मात्र, २०२३ च्या तुलनेत त्यात थोडीशी घट होणार आहे.



भारतीय अर्थव्यवस्थेने या वर्षीच नव्हे तर गेल्या काही वर्षांपासून इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. भारताचा आर्थिक विकास दर सातत्याने ६ टक्क्यांच्या वर राहिला आहे. तज्ञांचा अंदाज आहे की २०२४ आणि २०२५ मध्येही तो कायम राहील. यामुळे भारतात महागाई जास्त असली तरीही भारताला व्याजदर जास्त वाढवण्याची गरज नाही.


या अहवालानुसार, विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये गुंतवणूक अधिक झाली आहे. २०२३ मध्ये दक्षिण आशियातील, विशेषत: भारतातील गुंतवणूक वाढली आहे. मात्र चीनमधील गुंतवणुकीला बांधकाम क्षेत्रातून मोठा फटका बसला आहे.


अहवालात असेही अधोरेखित करण्यात आले आहे की हवामान-बदलामुळे दक्षिण आशियाला हानी पोहोचू शकते.


जुलै आणि ऑगस्टपर्यंत वाढलेला दुष्काळ, भारत, नेपाळ आणि बांगलादेशच्या बहुतेक भागांना प्रभावित करतो, तर सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे पाकिस्तानमध्ये समस्या निर्माण होतात. या आपत्तींचा जीडीपीमध्ये सर्वात मोठा वाटा असलेल्या देशांमध्ये सर्वात गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Baruipur Murder Case : गुप्तांगांवर जखमा, डोक्यावर प्रहार अन् १२ वर्षीय मुलीवर पाशवी बलात्कार; पश्चिम बंगाल हादरले!

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथे एका १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार

Cloudburst : ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास काय करावे? जाणून घ्या आपत्कालीन व्यवस्थापन आणि सुरक्षेचे उपाय

Cloudburst : सध्या राज्यात पावसाचा वेग वाढला आहे. नाशिकमध्ये तर ढगसदृश्य पाऊस सांगितला आहे. अशावेळेस नागरिकांनी घाबरून

Indian Navy : भारतीय नौदलाची ताकद वाढणार; 'आयएनएस महेंद्रगिरी' आणि 'आयएनएस मालवण' लवकरच ताफ्यात येणार

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढणार असून लवकरच ‘आयएनएस महेंद्रगिरी’ आणि ‘आयएनएस मालवण’ या दोन

Indian Navy : भारतीय नौदलाच्या युद्धनौकांच्या सिंगापूर भेटीची यशस्वी सांगता

नवी दिल्ली : भारत आणि सिंगापूर यांच्यातील दृढ सामरिक आणि सागरी भागीदारी अधिक मजबूत करत भारतीय नौदलाच्या पूर्व

Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती; विक्रोळी येथे बोअरिंगचे काम सुरू

मुंबई (Mumbai): मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पासाठी, पहिल्या टनेल बोरिंग मशीनने (TBM) आज विक्रोळी

VB-G-RAM-G च्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारकडून राज्यांना २५ हजार ८६३ कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित

नवी दिल्ली : केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यांच्या