Economy : चीनपेक्षा भारताची अर्थव्यवस्था सुस्थितीत : संयुक्त राष्ट्र

नवी दिल्ली : जगातील अर्थव्यवस्थेत (economy) भारताचे महत्त्वपूर्ण योगदान असून संयुक्त राष्ट्रांच्या मते, देशांतर्गत उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील चांगल्या मागणीमुळे भारताचा विकास दर २०२४ मध्ये ६.२ टक्के असेल असा अंदाज आहे.


World Economic Situation and Prospects (WESP) 2024 च्या अहवालात म्हटले आहे की, दक्षिण आशियाचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) २०२४ मध्ये ५.२ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. तर या अहवालानुसार, २०२५ मध्ये भारताचा जीडीपी ६.६ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.


तसेच उत्पादन आणि सेवा क्षेत्रात चांगली देशांतर्गत मागणी आणि विकास दर कायम राहील, असे अहवालात म्हटले आहे. मात्र, २०२३ च्या तुलनेत त्यात थोडीशी घट होणार आहे.



भारतीय अर्थव्यवस्थेने या वर्षीच नव्हे तर गेल्या काही वर्षांपासून इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. भारताचा आर्थिक विकास दर सातत्याने ६ टक्क्यांच्या वर राहिला आहे. तज्ञांचा अंदाज आहे की २०२४ आणि २०२५ मध्येही तो कायम राहील. यामुळे भारतात महागाई जास्त असली तरीही भारताला व्याजदर जास्त वाढवण्याची गरज नाही.


या अहवालानुसार, विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये गुंतवणूक अधिक झाली आहे. २०२३ मध्ये दक्षिण आशियातील, विशेषत: भारतातील गुंतवणूक वाढली आहे. मात्र चीनमधील गुंतवणुकीला बांधकाम क्षेत्रातून मोठा फटका बसला आहे.


अहवालात असेही अधोरेखित करण्यात आले आहे की हवामान-बदलामुळे दक्षिण आशियाला हानी पोहोचू शकते.


जुलै आणि ऑगस्टपर्यंत वाढलेला दुष्काळ, भारत, नेपाळ आणि बांगलादेशच्या बहुतेक भागांना प्रभावित करतो, तर सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे पाकिस्तानमध्ये समस्या निर्माण होतात. या आपत्तींचा जीडीपीमध्ये सर्वात मोठा वाटा असलेल्या देशांमध्ये सर्वात गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे