नवी दिल्ली : जगातील अर्थव्यवस्थेत (economy) भारताचे महत्त्वपूर्ण योगदान असून संयुक्त राष्ट्रांच्या मते, देशांतर्गत उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील चांगल्या मागणीमुळे भारताचा विकास दर २०२४ मध्ये ६.२ टक्के असेल असा अंदाज आहे.
World Economic Situation and Prospects (WESP) 2024 च्या अहवालात म्हटले आहे की, दक्षिण आशियाचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) २०२४ मध्ये ५.२ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. तर या अहवालानुसार, २०२५ मध्ये भारताचा जीडीपी ६.६ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.
तसेच उत्पादन आणि सेवा क्षेत्रात चांगली देशांतर्गत मागणी आणि विकास दर कायम राहील, असे अहवालात म्हटले आहे. मात्र, २०२३ च्या तुलनेत त्यात थोडीशी घट होणार आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेने या वर्षीच नव्हे तर गेल्या काही वर्षांपासून इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. भारताचा आर्थिक विकास दर सातत्याने ६ टक्क्यांच्या वर राहिला आहे. तज्ञांचा अंदाज आहे की २०२४ आणि २०२५ मध्येही तो कायम राहील. यामुळे भारतात महागाई जास्त असली तरीही भारताला व्याजदर जास्त वाढवण्याची गरज नाही.
या अहवालानुसार, विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये गुंतवणूक अधिक झाली आहे. २०२३ मध्ये दक्षिण आशियातील, विशेषत: भारतातील गुंतवणूक वाढली आहे. मात्र चीनमधील गुंतवणुकीला बांधकाम क्षेत्रातून मोठा फटका बसला आहे.
अहवालात असेही अधोरेखित करण्यात आले आहे की हवामान-बदलामुळे दक्षिण आशियाला हानी पोहोचू शकते.
जुलै आणि ऑगस्टपर्यंत वाढलेला दुष्काळ, भारत, नेपाळ आणि बांगलादेशच्या बहुतेक भागांना प्रभावित करतो, तर सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे पाकिस्तानमध्ये समस्या निर्माण होतात. या आपत्तींचा जीडीपीमध्ये सर्वात मोठा वाटा असलेल्या देशांमध्ये सर्वात गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
एमएमआरडीए महानगर आयुक्त यांची कोरियन उच्चस्तरीय शिष्टमंडळाने घेतली भेट मुंबई : मुंबई हे जागतिक मानकांनुसार…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला हरवले…
नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…
घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…
या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…
नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…