Economy : चीनपेक्षा भारताची अर्थव्यवस्था सुस्थितीत : संयुक्त राष्ट्र

नवी दिल्ली : जगातील अर्थव्यवस्थेत (economy) भारताचे महत्त्वपूर्ण योगदान असून संयुक्त राष्ट्रांच्या मते, देशांतर्गत उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील चांगल्या मागणीमुळे भारताचा विकास दर २०२४ मध्ये ६.२ टक्के असेल असा अंदाज आहे.


World Economic Situation and Prospects (WESP) 2024 च्या अहवालात म्हटले आहे की, दक्षिण आशियाचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) २०२४ मध्ये ५.२ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. तर या अहवालानुसार, २०२५ मध्ये भारताचा जीडीपी ६.६ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.


तसेच उत्पादन आणि सेवा क्षेत्रात चांगली देशांतर्गत मागणी आणि विकास दर कायम राहील, असे अहवालात म्हटले आहे. मात्र, २०२३ च्या तुलनेत त्यात थोडीशी घट होणार आहे.



भारतीय अर्थव्यवस्थेने या वर्षीच नव्हे तर गेल्या काही वर्षांपासून इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. भारताचा आर्थिक विकास दर सातत्याने ६ टक्क्यांच्या वर राहिला आहे. तज्ञांचा अंदाज आहे की २०२४ आणि २०२५ मध्येही तो कायम राहील. यामुळे भारतात महागाई जास्त असली तरीही भारताला व्याजदर जास्त वाढवण्याची गरज नाही.


या अहवालानुसार, विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये गुंतवणूक अधिक झाली आहे. २०२३ मध्ये दक्षिण आशियातील, विशेषत: भारतातील गुंतवणूक वाढली आहे. मात्र चीनमधील गुंतवणुकीला बांधकाम क्षेत्रातून मोठा फटका बसला आहे.


अहवालात असेही अधोरेखित करण्यात आले आहे की हवामान-बदलामुळे दक्षिण आशियाला हानी पोहोचू शकते.


जुलै आणि ऑगस्टपर्यंत वाढलेला दुष्काळ, भारत, नेपाळ आणि बांगलादेशच्या बहुतेक भागांना प्रभावित करतो, तर सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे पाकिस्तानमध्ये समस्या निर्माण होतात. या आपत्तींचा जीडीपीमध्ये सर्वात मोठा वाटा असलेल्या देशांमध्ये सर्वात गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे