काँग्रेसला देशातील सनातन हिंदू धर्म संपवायचा आहे काय?

आमदार नितेश राणे यांचा घणाघात


कणकवली : काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्ष यांना देशातील सनातन हिंदू धर्म संपवायचा आहे. त्यासाठीच प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले जात आहे. मात्र यांनी कितीही प्रयत्न केला तरी ते यात यशस्वी होणार नसल्याचा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. तसेच काँग्रेसने उबाठा सेना संपविण्याचा घाट घातला असल्याचा हल्लाबोलही आमदार राणे यांनी केला.


नितेश राणे म्हणाले की, अदाणी समूहाबाबत काल सुप्रीम कोर्टाने अतिशय महत्त्वाचा निकाल दिला. त्यांच्या उद्योगामुळे आपला देश प्रगतीपथावर आहे. असे असताना विरोधक हिंडनबर्ग रिपोर्टच्या नावाखाली देशाची बदनामी करत होते. हा प्रकार सुप्रीम कोर्टाने हाणून पडला आहे. त्यामुळे मिर्ची झोंबल्याने खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी टीका केली. संजय राऊत हे सातत्याने कोर्टाचा अपमान करत आहे. उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर चुकीच्या पद्धतीने टीका करून कोर्टाची बदनामी करत आहेत. त्यामुळे राऊत यांच्यावर कोर्टाने सुमोटो कारवाई करावी अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली.


आमदार जितेंद्र आव्हाड धमकी प्रकरणी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की, प्रभू श्री राम यांचा अपमान केल्यानंतर तो कुठलाही हिंदू सहन करणार नाही.

Comments
Add Comment

मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकाऱ्यांनी घेतली मतदान नियमावलीची माहिती अन् अनुभवले ईव्हीएम यंत्राचे प्रात्यक्षिक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार

एमपीएससी परीक्षेत प्रत्येक प्रश्नासाठी उत्तर देणे बंधनकारक

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकेत बदल करण्यात आले

लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील दीड कोटी महिलांना ई-केवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार ▪️मुंबई मेट्रो रेल

उबाठा गटाने ४२ जणांना दिले एबी फॉर्म

मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या आणि

मुंबई मनपासाठी भाजपची पहिली यादी जाहीर! ६७ जणांना उमेदवारी

मुंबई: महानगर पालिका निवडणूक २०२५ साठी सर्वच पक्षांकडून जागा वाटपासाठी बैठकींचा धडाका सुरू आहे. राज्यात