महाबळेश्वर : थंडीच्या मोसमात (Winter season) महाराष्ट्रातील महाबळेश्वर (Mahabaleshwar) आणि माथेरान (Matheran) या ठिकाणी हमखास गर्दी पाहायला मिळते. महाबळेश्वर हे कुटुंबासमवेत फिरण्यासाठी अत्यंत लोकप्रिय ठिकाण आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी असलेल्या वेण्णा तलावात (Venna lake)घोड्यांच्या मिसळत असलेल्या विष्ठेमुळे (Horse manure) पर्यटकांमध्ये रोगराई (Disease) पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे.
महाबळेश्वरच्या वेण्णा तलावाजवळ पर्यटकांचे आकर्षण ठरणाऱ्या घोड्यांची विष्ठा महाबळेश्वरमध्ये वर्षानुवर्षे रोगराई पसरवत असल्याचे एका अभ्यासातून समोर झाले आहे. ही विष्ठा तलावाच्या पाण्यात मिसळत असल्याने अतिसार, अन्नविषबाधा, श्वसनाचा तीव्र संसर्ग, बुरशीजन्य संसर्ग आणि टायफॉइड असे आजार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोखले इन्स्टिट्यूटने महाबळेश्वरसंदर्भात केलेल्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. या प्रकरणाची दखल घेत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
रोगराईमागची कारणे शोधण्याचे काम गोखले इन्स्टिट्यूने हाती घेतले. सर्वप्रथम महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही शहरांचा पिण्याच्या पाण्याचा स्रोत असलेल्या वेण्णा तलावाच्या पाण्यासह इतर सर्व स्रोत, जलशुद्धीकरण केंद्रे, घरे, व्यावसायिक आस्थापना व भूजल यांचे सखोल नमुने घेण्यात आले. या सर्व नमुन्यांमध्ये प्रदूषण दिसून आले.
त्यानंतर संशोधकांच्या पथकाने या प्रदूषणाचा उगम शोधण्यास सुरुवात केली. या शोधाअंती घोड्यांचा विष्ठायुक्त कचरा व वेण्णा तलावालगत उभ्या असलेल्या घोड्यांची विष्ठाही पाण्यात मिसळली जात असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय महाबळेश्वरमधील सर्व रस्त्यांवर आणि पाण्याच्या पाइपलाइनलगत घोड्यांचा विष्ठायुक्त कचरा आढळतो. घोड्यांच्या विष्ठेमध्ये प्रदूषणाव्यतिरिक्त इतर विषाणू आणि जीवाणू असल्याने पाणी दूषित होऊन ते सर्व आजारांना कारणीभूत ठरत असल्याचे सिद्ध झाले.
या प्रकरणी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी आणि महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. गोखले इन्स्टिट्यूटच्या टीमने सुचविलेल्या उपाययोजनांनुसार, महाबळेश्वरमध्ये बदल होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थे’च्या ‘सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ (सीएसडी) या संस्थेच्या माध्यमातून ‘आरोग्य जोखीम मूल्यांकन संशोधन प्रकल्प’ हाती घेण्यात आला होता. या प्रकल्पासाठी महाबळेश्वरची निवड करण्यात आली. संस्थेच्या प्रा. डॉ. प्रीती मस्तकार यांच्या नेतृत्वाखाली निखिल अटक, दिशा सावंत, रोहिणी सातपुते, सूरज भोळे आणि विनित दुपारे यांनी या प्रकल्पावर काम केले.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…