Suruchi Adarkar : लग्नानंतर काही दिवसांतच सुरुची अडारकरने घेतला 'हा' मोठा निर्णय

  420

सुरुची होणार व्हिलन


मुंबई : अभिनेत्री सुरुची अडारकर (Suruchi Adarkar) नुकतीच ६ डिसेंबर रोजी अभिनेता पीयुष रानडेसोबत (Piyush Ranade) विवाहबंधनात अडकली. विशेष म्हणजे पीयुषचं हे तिसरं लग्न आहे, तर सुरुचीने पहिल्यांदा लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर काही दिवसांतच सुरुचीने अजिबात वेळ न दवडता कामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुचीला 'का रे दुरावा' (Ka Re Durava) या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. यानंतर ती तब्बल ८ वर्षांनी पुन्हा एकदा झी मराठीवर (Zee Marathi) दिसणार आहे. यावेळेस ती खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे तिचा हा अवतार पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.


झी मराठीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satavya Mulichi Satavi Mulgi) ही मालिका सध्या चांगली गाजत आहे. यात तितिक्षा तावडे आणि अजिंक्य ननावरे प्रमुख भूमिकेत आहेत. शिवाय ऐश्वर्या नारकर यांची महत्त्वाची भूमिका आहे. याच मालिकेतून सुरुची दमदार एंट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे.


सुरुचीचं पात्र मालिकेतील विरोचकाच्या सेवकाशी संबंधित असल्याचं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे स्पष्ट होत आहे. त्यामुळे अभिनेत्री या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत झळकण्याची दाट शक्यता आहे. भूमिकेसाठी सुरुचीला काहीसा ग्लॅमरस लूक देण्यात आला आहे. ६ जानेवारीला प्रसारित होणाऱ्या भागात सुरुची एन्ट्री घेणार आहे.


‘का रे दुरावा’ या मालिकेतून अभिनेत्री सुरुची अडारकर घराघरांत लोकप्रिय झाली. या मालिकेत सुरुचीसह सुबोध भावे व सुयश टिळक हे दोन अभिनेते प्रमुख भूमिकेत होते. २०१४ मध्ये सुरू झालेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. अखेर २०१६ मध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. यानंतर सुरुचीने छोट्या पडद्यावरील अनेक मालिका व चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. आता ‘का रे दुरावा’नंतर तब्बल ८ वर्षांनी ती पुन्हा एकदा ‘झी मराठी’वर पुनरागमन करायला सज्ज झाली आहे.

Comments
Add Comment

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर