Suruchi Adarkar : लग्नानंतर काही दिवसांतच सुरुची अडारकरने घेतला 'हा' मोठा निर्णय

सुरुची होणार व्हिलन


मुंबई : अभिनेत्री सुरुची अडारकर (Suruchi Adarkar) नुकतीच ६ डिसेंबर रोजी अभिनेता पीयुष रानडेसोबत (Piyush Ranade) विवाहबंधनात अडकली. विशेष म्हणजे पीयुषचं हे तिसरं लग्न आहे, तर सुरुचीने पहिल्यांदा लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर काही दिवसांतच सुरुचीने अजिबात वेळ न दवडता कामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुचीला 'का रे दुरावा' (Ka Re Durava) या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. यानंतर ती तब्बल ८ वर्षांनी पुन्हा एकदा झी मराठीवर (Zee Marathi) दिसणार आहे. यावेळेस ती खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे तिचा हा अवतार पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.


झी मराठीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satavya Mulichi Satavi Mulgi) ही मालिका सध्या चांगली गाजत आहे. यात तितिक्षा तावडे आणि अजिंक्य ननावरे प्रमुख भूमिकेत आहेत. शिवाय ऐश्वर्या नारकर यांची महत्त्वाची भूमिका आहे. याच मालिकेतून सुरुची दमदार एंट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे.


सुरुचीचं पात्र मालिकेतील विरोचकाच्या सेवकाशी संबंधित असल्याचं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे स्पष्ट होत आहे. त्यामुळे अभिनेत्री या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत झळकण्याची दाट शक्यता आहे. भूमिकेसाठी सुरुचीला काहीसा ग्लॅमरस लूक देण्यात आला आहे. ६ जानेवारीला प्रसारित होणाऱ्या भागात सुरुची एन्ट्री घेणार आहे.


‘का रे दुरावा’ या मालिकेतून अभिनेत्री सुरुची अडारकर घराघरांत लोकप्रिय झाली. या मालिकेत सुरुचीसह सुबोध भावे व सुयश टिळक हे दोन अभिनेते प्रमुख भूमिकेत होते. २०१४ मध्ये सुरू झालेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. अखेर २०१६ मध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. यानंतर सुरुचीने छोट्या पडद्यावरील अनेक मालिका व चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. आता ‘का रे दुरावा’नंतर तब्बल ८ वर्षांनी ती पुन्हा एकदा ‘झी मराठी’वर पुनरागमन करायला सज्ज झाली आहे.

Comments
Add Comment

कुर्ला पश्चिम भागातील तुंबणाऱ्या पाण्याचा आता बंदोबस्त...

मुंबई (सचिन धानजी) : कुर्ला पश्चिम येथील प्रिमियर नाल्याला जोडणाऱ्या भारतीय नगर नाला आणि विनोबा भावे नाल्याचे

आता लोकल गाड्या दादर, ठाण्यापर्यंतच धावणार; ३ महिने राहणार हे' प्लॅटफॉर्म बंद

मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. दररोज प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना आता एका मोठ्या जम्बो ब्लॉक चा

भारतातील मलेरिया रुग्णसंख्येत लक्षणीय घट

मुंबई : मलेरिया हा आजार एकेकाळी भारतातील सार्वजनिक आरोग्यासमोरील मोठे आव्हान मानला जात होता. मात्र गेल्या दशकात

Rohit Shetty : बॉलिवूड हादरलं! ॲक्शन किंग अन् दिग्दर्शक रोहित शेट्टींच्या जुहूतील बंगल्यावर मध्यरात्री गोळीबार; तो आला अन्...थेट

मुंबई : बॉलीवूडचे 'ॲक्शन किंग' म्हणून ओळखले जाणारे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर

वाढत्या वायुप्रदूषणाचा डोळ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम

१८ ते ४५ वयोगटांतील नागरिकांमध्ये या तक्रारींचे प्रमाण अधिक मुंबई : मुंबईतील वाढते वायुप्रदूषण आता केवळ

धारावी ते घाटकोपरमधील प्रक्रिया केलेले मलजल भांडुप संकुलात

पाणी वहन करण्यासाठी संकुलात ९७० लिटर क्षमतेचा जलबोगद्याची उभारणी मलजल प्रक्रिया केंद्रातील पाणी वहन करणाऱ्या