Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील तुटलेल्या पुलाचा भाग वेल्डिंगनंतरही पुन्हा निखळला

कामगारांचा हलगर्जीपणा आला समोर


बुलढाणा : समृद्धी महामार्गावरुन (Samruddhi Mahamarg) आतापर्यंत अनेक अपघाताच्या घटना (Accidents) समोर आल्या आहेत. हे अपघात टाळण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना देखील राबवत आहे. मात्र, या मार्गावर पुन्हा एकदा अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. याचं कारण म्हणजे, समृद्धी महामार्गावरील पुलाचा ५ दिवसांपूर्वी तुटलेला भाग पुन्हा निखळला आहे. यावरुन या भागाची तात्पुरती डागडुजी करण्यात आल्याचं निदर्शनास येत आहे.


पाच दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडोरवरील बीड ते सिंदखेड राजा दरम्यान चेनेज ३१९ वरील एका पुलाचा लोखंडी भाग तुटून वर आला होता. यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता. प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत दुरुस्ती कामास सुरुवात केली आणि तो लोखंडी भाग वेल्डिंग करुन पूर्ववत केला.


मात्र, पाचच दिवसांत त्या भागाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे ज्याच्या हाती हे काम सोपवलं होतं त्या कामगारांनी हलगर्जीपणा केल्याचं समोर आलं आहे. त्यांनी तात्पुरती वेल्डिंग करून दुरुस्ती केली आहे. त्यामुळे याकडे पुन्हा एकदा लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.


Comments
Add Comment

Raigad News: आईने चार मुलांना विषारी थंडपेय पाजून स्वतःही केले विषप्राशन; तिघांचा मृत्यू, दोन मुलांची प्रकृती गंभीर

रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण

Palghar Crime : पालघरमध्ये भररस्त्यात तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; CCTV व्हायरल, प्रकृती चिंताजनक

Palghar Crime : पालघर : पालघर (Palghar) शहरात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला (Attack) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली

Crime News: धक्कादायक! लग्नात अडथळा ठरत असल्याने प्रेयसीची निर्घृण हत्या; शिक्षकासह वडील आणि मामा अटकेत

दोडामार्ग: प्रेमसंबंधातून सुरू झालेल्या नात्याचा शेवट एका धक्कादायक हत्याकांडात (Murder) झाला आहे. कर्नाटकातील

Maharashtra Monsoon Weather Alert : महाराष्ट्रात निसर्गाचा लहरी खेळ! कुठे मुसळधार पाऊस, तर कुठे उष्णतेची लाट; मान्सून कधी येणार?

केरळमध्ये वेळेवर दाखल झाल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे ६ जून रोजी महाराष्ट्रात प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर

Bhimashankar Temple : भाविकांसाठी आनंदाची बातमी! 5 महिन्यांनंतर भीमाशंकर मंदिर 15 जूनपासून खुले; गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था

पुणे: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर (Bhimashankar Temple) हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तब्बल पाच ते सहा

Wari 2026: लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

मुंबई दि. १३ जून : पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांना