Loksabha Elections : लोकसभेसाठी महायुती सज्ज; संक्रांतीच्या आदल्या दिवसापासून राज्यभर मेळावे

मुंबई : यंदाच्या वर्षात होणार्‍या लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Elections) सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महायुतीने (Mahayuti) देखील आपला विजय पक्का करण्यासाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीची आज संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी तिन्ही पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते. महायुतीच्या पुढील मेळाव्यांबद्दल या पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली.


राज्यभरात महायुतीचे मेळावे घेण्याचे नियोजन आहे. त्यानुसार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १४ जानेवारीपासून राज्यात मेळावे घेतले जातील, अशी माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिली.


येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकत्र निवडणूक लढवणार आहेत. त्यादृष्टीने रणशिंग फुंकण्यात आलं आहे. महायुती लोकसभेच्या ४५ जागा जिंकेल असा दावा नेत्यांकडून करण्यात आला आहे. त्यासाठीच १४ जानेवारीपासून मेळावे सुरु करण्यात येणार आहेत. फेब्रुवारीमध्ये मेळावे संपवण्याचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावळकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे.


तीन पक्ष एकत्रपणे निवडणुकाला सामोरे जाणार आहोत. सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहेत. जानेवारीमध्ये जिल्हा आणि गाव पातळीवर मेळाव्यांचे आयोजन केले जाईल. फेब्रुवारीमध्ये विभागस्तरावर मेळावे होतील. फेब्रुवारीमध्ये मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  यांच्या नेतृत्वात मेळावे होतील, अशी माहिती चंद्रशेखर बानवकुळे यांनी दिली.

Comments
Add Comment

Mumbai Police Viral Video : आंदोलक विद्यार्थिनीशी पोलिसांकडून गैरवर्तन नाही!

- व्हायरल व्हिडिओवर मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण मुंबई : मुंबईतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान साध्या वेशातील

Security tightened : राज्यातील संवेदनशील ठिकाणे आणि वरिष्ठ नेत्यांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ

मुंबई : दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद उमटण्याची शक्यता आणि आगामी राजकीय मोर्चे लक्षात घेता महाराष्ट्र

Childhood Cancer : बालरुग्णांच्या कर्करोग निदानासाठी मिळणार आर्थिक सहाय्य

- त्रिपक्षीय करारातून राज्यातील २०० बालरुग्णांना मिळणार लाभ मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अंतर्गत

BMC : मुंबईत मुसळधार पाऊस सुरूच; चार तलाव ओसंडून वाहत असतानाही बीएमसीची १०% पाणी कपात कायम

मुंबई: मान्सूनच्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातपैकी चार महत्त्वाचे तलाव पूर्णपणे भरले

BMC Canteen : महापालिका मुख्यालयातील उपहारगृह त्वरीत बंद करण्याची एफडीएचे निर्देश

संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे स्थायी समिती अध्यक्षांचे प्रशासनाला निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) :

Juhu Beach : जुहू चौपाटीवरील कचरा उचलण्यास विलंब का झाला? संबंधित अधिकाऱ्यांवर करा कारवाई

मागील दहा वर्षातील कंत्राट कामाची चौकशी करा स्थायी समिती सदस्यांची मागणी मुंबई : मागील पावसाळ्यात विविध नाले