Dhangar Reservation : धनगर आरक्षणाबाबत आजपासून हायकोर्टात सुनावणी

  159

काय आहे धनगरांची मागणी?


मुंबई : राज्यभरात मराठा समाजाच्या आरक्षणावरुन (Maratha Samaj reservation) चांगलाच वाद पेटला आहे. मराठा आणि ओबीसी (OBC) समाजातील वाद सुरु असताना यात धनगरांच्या आरक्षणाचा (Dhangar Reservation) मुद्दाही चर्चेत आला. धनगर आरक्षणासाठी देखील ठिकठिकाणी उपोषण करण्यात आले. राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीत (Scheduled caste) समाविष्ट करावे, यासाठी धनगरांचा लढा सुरु आहे. धनगरांच्या या मागणीवर आजपासून हायकोर्टात (High Court) होणार सुनावणी होणार आहे.


धनगरांना अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. शासन दरबारी धनगड अशी नोंद आहे. मात्र, राज्यातील धनगर हे धनगड नसून धनगर आहेत, असं या याचिकेत म्हटलं आहे. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुनावणी होणार आहे. त्यामुळे ही सुनावणी महत्त्वाची मानली जात असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


सध्या राज्यातील धनगर समाजाला ओबीसीचे राजकीय आरक्षण असून, धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे म्हणजेच एसटीचे आरक्षण देण्याची मागणी होत आहे. तर, धनगर समाजाला आरक्षण मिळेल आणि निकाल आमच्याच बाजूने लागेल असा विश्वास भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही