Nitesh Rane : भांडुपच्या सोम्यागोम्याला थोबाड बंद करण्याची दहा जनपथची तंबी!

आमदार नितेश राणे यांचा संजय राऊतांना सणसणीत टोला


मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात 'सोम्यागोम्या' या शब्दावरुन वार पलटवार सुरु होते. अजित पवारांनी संजय राऊत यांचा सोम्यागोम्या असा उल्लेख केल्यानंतर सोम्यागोम्या कोण हे २०२४ च्या निवडणुकीत कळेल, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. यावर आज भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊत यांना चांगलंच खडसावलं आहे.


नितेश राणे म्हणाले, भांडुपमध्ये बसून सोम्यागोम्यांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या जागावाटपाबद्दल बोलू नये. तुझी लायकी किती आहे हे तुझ्या मालकाला काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी खडसावलं आहे, याची बातमी आमच्याकडे आहे. उद्धवजींना दहा जनपथवरुन कडक आदेश आले आहेत, की संजय राजाराम राऊतचं थोबाड बंद करा. अशी तंबी मिळाल्यानंतर एरंडेल प्यायल्यासारखा त्याचा चेहरा झाला आहे. म्हणून जागावाटपाच्या चर्चेच्या मोठ्या मोठ्या बाता करण्याअगोदर तुझ्या मालकाची थोडी इज्जत ठेवायची असेल तर सकाळचं थोबाड बंद कर आणि घरी बस, असं नितेश राणे यांनी राऊतांना ठणकावलं.





काशीबाबत वक्तव्य करणार्‍या संजय राऊतांचा नितेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, सामनामध्ये काशी कलंकीत झाली आहे याबद्दल अग्रलेख लिहिला आहे, असं संजय राऊत म्हणतो. पण काशी कलंकीत खर्‍या अर्थाने कधी झाली तर काही आठवड्यांअगोदर तुझ्या मालकाचा मुलगा आपल्या पापाचं प्रायश्चित करण्यासाठी काशीत गेला तेव्हा काशीमध्ये गोमूत्र शिंपडण्याची वेळ आली होती. त्यामुळे काशीला शुद्ध ठेवण्याचं काम आमचं हिंदुत्ववादी विचारांचं केंद्र आणि राज्य सरकार निश्तिच पद्धतीने करेल. फक्त तुझ्या मालकाचा मुलगा काशीमध्ये येऊन आपलं पाप धुण्याचा जो प्रयत्न करतो त्याबद्दलही अग्रलेख लिहिलास तर बरं होईल, असं नितेश राणे म्हणाले.




Comments
Add Comment

कबुतरांना दाणे घालणं पडलं महागात! बसला हजारोंचा दणका

मुंबई: कबुतरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका असल्याने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय मुंबई

New Year News Rules : नवं वर्ष, नवे नियम! १ जानेवारीपासून तुमचे आर्थिक गणित बदलणार; २०२६ मध्ये लागू होणारे 'हे' १० मोठे बदल!

मुंबई : वर्ष २०२५ ला निरोप देण्यासाठी आता अवघे ४ दिवस उरले असून, १ जानेवारी २०२६ पासून आपल्या दैनंदिन जीवनातील

कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शासकीय सदनिकांचे वाटप

मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईतील शासकीय निवासस्थान वाटपावरून येणाऱ्या तक्रारींची

पश्चिम रेल्वेवर शनिवारी ३०० फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक जलद आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल मुंबई : मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य

पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे; ते नावाआधी लावता येणार नाही

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी

राज्यात जनसुरक्षा कायदा लागू

अध्यादेश जारी; कडव्या डाव्या संघटनांवर होणार कारवाई मुंबई : बहुचर्चित जनसुरक्षा कायदा अखेर राज्यात लागू झाला