Sambhaji Nagar: संभाजी नगरमधील एका कंपनीला भीषण आग, ६ जणांचा होरपळून मृत्यू

संभाजी नगर: महाराष्ट्रच्या संभाजीनगर(sambhajinagar) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे हातातील मोजे बनवणाऱ्या फॅक्टरीमध्ये अचानक आग(fire) लागली. या आगीत होरपळून ६ मजुरांचा मृत्यू झाला. या अपघातात ६ मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर ४ जण आपला जीव वाचवण्यात यशस्वी ठरले. ही घटना औद्योगिक क्षेत्रात हाताचे मोजे बनवणारी कंपनी सनशाईन एंटरप्रायजेसमध्ये झाली आहे.


ही दुर्घटना ३० डिसेंबरच्या रात्री घडली होती. या कंपनीत १० कामगार झोपले होते. मोजे बनवणारी कंपनी सनशाईन एंटरप्रायजेस सी २१६, वालाज औद्योगिक क्षेत्रात २० ते २५ कामगारांना रोजगार दिला जातो. १० कामगार कंपनीतच राहत होते. गेल्या रात्री जेव्हा सर्व लोक बाहेर झोपत होते तेव्हा अचानक उष्णता वाढल्याने झोपलेले कर्मचारी जागी झाले. दारावरच आग लागल्याने त्यांना बाहेर पडताच आले नाही. मात्र काही कागारांना पत्रा उचलून झाडाच्या मदतीने बाहेर आले.


 


मृत कामगारांमध्ये मिर्झापूरचे भल्ला शेख, कौसर शेख, इकबाल शेख मगरूफ शेख आणि इतर दोन जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना शनिवारी रात्री उशिरा २.१५ वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी जेव्हा टीम पोहोचली तेव्हा फॅक्टरीमध्ये आग लागली होती. या दरम्यान, स्थानिक लोकांनी सांगितले की फॅक्टरीच्या आत ६ जण अडकले होते.


यानंतर फायर ब्रिगेडचे कर्मचारी आत आले आणि त्यांनी ६ मृतदेह हाती घेतले. कंपनीमध्ये ज्या वेळेस आग लागली त्यावेळेस १०-१५ कर्मचारी आत झोपले होते. यातील चार जण आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले. मात्र ६ जण आपला जीव वाचवू शकले नाहीत.

Comments
Add Comment

Intelligence Bureau : पालघरमध्ये 'इंटेलिजन्स ब्युरो'साठी हक्काची जागा

- महसूल विभागाचा मोठा निर्णय; वसईत कार्यालय आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा मुंबई : पालघर जिल्ह्याच्या

Cyclone Shelter Center in Dapoli : दापोली तालुक्यातील चक्रीवादळ निवारा केंद्रासाठी महसूलकडून विनामूल्य जागा

मुंबई : कोकण किनारपट्टीवरील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला

Onion processing industry: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा प्रक्रिया उद्योगास चालना देणार - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा,

Industries Minister Dr. Uday Samant : पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे

Industries Minister Dr. Uday Samant - 'एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार : उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी

Ashok Kharat : 'लक्ष्मण' ते भोंदूबाबा 'अशोक खरात'; ४० वर्षांपूर्वीच गावकऱ्यांनी दिला होता बेदम चोप!

अहिल्यानगर : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या अशोक खरात याच्या कृत्यांची मुळं चाळीस