Sambhaji Nagar: संभाजी नगरमधील एका कंपनीला भीषण आग, ६ जणांचा होरपळून मृत्यू

संभाजी नगर: महाराष्ट्रच्या संभाजीनगर(sambhajinagar) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे हातातील मोजे बनवणाऱ्या फॅक्टरीमध्ये अचानक आग(fire) लागली. या आगीत होरपळून ६ मजुरांचा मृत्यू झाला. या अपघातात ६ मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर ४ जण आपला जीव वाचवण्यात यशस्वी ठरले. ही घटना औद्योगिक क्षेत्रात हाताचे मोजे बनवणारी कंपनी सनशाईन एंटरप्रायजेसमध्ये झाली आहे.


ही दुर्घटना ३० डिसेंबरच्या रात्री घडली होती. या कंपनीत १० कामगार झोपले होते. मोजे बनवणारी कंपनी सनशाईन एंटरप्रायजेस सी २१६, वालाज औद्योगिक क्षेत्रात २० ते २५ कामगारांना रोजगार दिला जातो. १० कामगार कंपनीतच राहत होते. गेल्या रात्री जेव्हा सर्व लोक बाहेर झोपत होते तेव्हा अचानक उष्णता वाढल्याने झोपलेले कर्मचारी जागी झाले. दारावरच आग लागल्याने त्यांना बाहेर पडताच आले नाही. मात्र काही कागारांना पत्रा उचलून झाडाच्या मदतीने बाहेर आले.


 


मृत कामगारांमध्ये मिर्झापूरचे भल्ला शेख, कौसर शेख, इकबाल शेख मगरूफ शेख आणि इतर दोन जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना शनिवारी रात्री उशिरा २.१५ वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी जेव्हा टीम पोहोचली तेव्हा फॅक्टरीमध्ये आग लागली होती. या दरम्यान, स्थानिक लोकांनी सांगितले की फॅक्टरीच्या आत ६ जण अडकले होते.


यानंतर फायर ब्रिगेडचे कर्मचारी आत आले आणि त्यांनी ६ मृतदेह हाती घेतले. कंपनीमध्ये ज्या वेळेस आग लागली त्यावेळेस १०-१५ कर्मचारी आत झोपले होते. यातील चार जण आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले. मात्र ६ जण आपला जीव वाचवू शकले नाहीत.

Comments
Add Comment

Industries Minister Dr. Uday Samant : पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे

Industries Minister Dr. Uday Samant - 'एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार : उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी

Ashok Kharat : 'लक्ष्मण' ते भोंदूबाबा 'अशोक खरात'; ४० वर्षांपूर्वीच गावकऱ्यांनी दिला होता बेदम चोप!

अहिल्यानगर : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या अशोक खरात याच्या कृत्यांची मुळं चाळीस

Gahininath fort : गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी कटिबद्ध - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लाखो भाविकांच्या उपस्थितीत नारळी सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न बीड : म्हसोबावाडी (ता.

All priests will earn the same : मंदिरांतील पुजाऱ्यांचे मानधन एकसमान होणार

राज्य सरकार धोरण ठरवणार; मंत्रालयात झाली विशेष बैठक मुंबई : काही देवस्थानांमध्ये पुजाऱ्यांना नियमित वेतन दिले

Jalna Murder Case : आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी ठरवलेला दिवसच ठरला अंतिम, पोटच्या मुलानेच केली निघृण हत्या

जालना जिल्ह्यामधील अंबड तालुक्यात एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पोटच्या मुलानेच आपल्या