PM Narendra Modi : मोदींची गॅरंटी म्हणजे निवडणूक विजयाचा फॉर्म्युला नव्हे तर गरिबांना दिलेली वचनपूर्ती

बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींनी दिले चोख उत्तर


नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) दृष्टीने सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. विरोधक इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) नावाने एकत्र आलेले असले तरी जागावाटपाच्या वादामुळे त्यांच्यात मतभेद असल्याचेच दिसून येते. त्यातच विरोधक सातत्याने अनेक मुद्दे उपस्थित करत सत्ताधार्‍यांना घेरण्याचा प्रयत्न करत असतात. सत्ताधारी देखील त्यांना तोडीस तोड उत्तर देतात. विरोधकांनी आपल्या सभा व जाहीर भाषणांमधून मोदी सरकारवर सातत्याने टीका केली आहे. मात्र, या सगळ्याची उत्तरं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहेत.


पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलेल्या बेरोजगारी (Unemployment), महागाईसारख्या (Inflation) प्रश्नांवर चोख आणि समाधानकारक उत्तरं दिली आहेत. यावळेस मोदींची गॅरंटी म्हणजे निवडणूक विजयाचा फॉर्म्युला नव्हे तर गरिबांना दिलेली वचनपूर्ती आहे. सध्या देशातल्या प्रत्येक गरिबाला माहित आहे की मोदी कधीही आपल्या कर्तव्यापासून मागे हटणार नाही. त्यामुळे त्यांच्या विश्वासाला माझ्याकडून कधीही तडा जाणार नाही, असंदेखील पंतप्रधान मोदी म्हणाले.


मोदींनी यावेळी महागाईच्या मुद्द्यावर भाष्य केलं. ते म्हणाले “आपण थोडा वेळ यावर होणारे आरोप बाजूला ठेवू आणि तथ्यांवर बोलू. या काळात दोन वर्ष न भूतो न भविष्यती असं कोरोनाचं संकट उद्भवलं होतं. जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या संकटामुळे अर्थव्यवस्थेची साखळी विस्कळीत झाली होती. अनेक देशांमध्ये मंदीसदृश्य परिस्थिती होती. मात्र तरीही भारतानं या संकटाशी उल्लेखनीय ठरावा असा सामना केला आणि आपली पत राखली”, असं मोदी यावेळी म्हणाले.


काँग्रेसच्या काळातील सरासरी महागाईची टक्केवारी २०१४ नंतर खाली आणली


“जागतिक पातळीवरचं संकट, गंभीर आव्हानं, विस्कळीत झालेली पुरवठा साखळी, भौगोलिक व राजकीय स्तरावर निर्माण झालेले वाद यामुळे जगभरात मूलभूत गरजेच्या गोष्टींच्या किमतीही वाढल्या होत्या. २०१४-१५ ते २०२३-२४ या काळातली सरासरी महागाई ५.१ टक्के होती. २००४ ते २०१४ या काळात हीच महागाई ८.२ टक्क्यांवर होती. मग यापैकी कोणता महागाईचा दर जास्त आहे?” असा सवाल उपस्थित करत मोदीजींनी विरोधकांना तोंडावर पाडले.



देशातल्या बेरोजगारीचं काय?


बेरोजगारी व अपुऱ्या नोकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलताना मोदी म्हणाले, “हे सर्वश्रुतच आहे की पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केल्यास त्याचा मोठा सकारात्मक परिणाम देशाच्या विकासदर वाढीवर आणि रोजगारावर होतो. त्यामुळे आम्ही पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने गुंतवणूक केली आहे. २०१३-१४ साली या क्षेत्रात १.९ लाख कोटी रुपये गुंतवणूक होती. ती २०२३-२४ साली वाढून १० लाख कोटींवर पोहोचली आहे”, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी केला.


“देशात पायाभूत सुविधांचे प्रकल्प कधी नव्हे इतक्या वेगाने उभे राहात आहेत. प्रत्येक क्षेत्रात १० वर्षांपूर्वी आपण जशी प्रगती करत होतो त्यापेक्षा कित्येक पटींनी चांगली कामगिरी आपण आत्ता करत आहोत”, असंही मोदी म्हणाले.



धोरणांमधील सुधारणांचा चांगला परिणाम


तसेच धोरणांच्या सुधारणांद्वारे लोकांचं जीवनमान सुधारण्याच्या दृष्टीने लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या सुधारणांमुळे भारताच्या विकासाच्या प्रवासाने आता वेग धारण केला आहे. यामुळे भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाकडे जाण्याचा आत्मविश्वास वाढला आहे, अशा भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या.

Comments
Add Comment

Melody Trend and Parle Shares : 'Melodi' ट्रेंडची कमाल; क्षणार्धात वाढले पार्लेचे शेअर्स; पण फायदा मात्र दुसऱ्याच कंपनीचा झाला; जाणून घ्या नेमकं काय घडलं

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इटलीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर नरेंद्र मोदी यांनी

DRDO : आता यूएवीमधून डागता येणार निर्देशित क्षेपणास्त्र; डीआरडीओच्या चाचण्या पूर्ण

- आंध्र प्रदेशातील कुरनूलजवळील डीआरडीओ चाचणी क्षेत्रात ही कामगिरी साध्य नवी दिल्ली : भारत आता मानवरहित हवाई

Shocking : खेळता-खेळता गाडीत अडकली, दोन तास ऑक्सिजनसाठी धडपडली अन् गुदमरून ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

मध्य प्रदेश : आपले घर आणि घराचे अंगण हे मुलांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण असते, असा प्रत्येक पालकाचा ठाम विश्वास

Iran America War : मोबाईलमधील इंटरनेट आणि UPI सेवा ठप्प होणार ? इराणच्या खळबळजनक वक्तव्याने उडाली तारांबळ!

आजच्या काळात श्वास घेण्याइतकेच इंटरनेट (Internet) गरजेचे झाले आहे. सकाळच्या अलार्मपासून ते रात्रीच्या सोशल मीडिया (Social

Stray Dogs : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय : शाळा आणि रुग्णालयांंजवळून भटके कुत्रे हटवण्याचे आदेश कायम

नवी दिल्ली : देशात भटक्या कुत्र्यांचा वाढता प्रादुर्भाव (Stray Dogs) आणि त्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटना लक्षात

Uttarakhand Train Accident : ऋषिकेशमध्ये मोठा रेल्वे अपघात टळला! उज्जयनी एक्सप्रेसचे ३ डब्बे रुळावरून घसरले

ऋषिकेश : उत्तराखंडमधील ऋषिकेश (Uttarakhand Train Accident) येथे उज्जयनी एक्सप्रेसशी संबंधित धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टेशन