School Bus Accident : शाळेच्या सहलीसाठी कोकणात जात असताना बसचा भीषण अपघात

दोघांचा मृत्यू, तर ५५ जण जखमी


रायगड : गेल्या काही दिवसांत अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यातच रायगडमध्ये (Raigad News) आज सकाळी एक भीषण अपघात (Terrible Accident) झाला. पुण्याहून शाळेची सहल (School picnic) कोकणात येत असताना या ट्रॅव्हल बसचा अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाला, तर ५५ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.


रायगडमधील माणगाव ते पुणे दरम्यानच्या ताम्हीणी घाटात अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने शाळेच्या सहलीची खासगी बस उलटली. कोंडेघर गाव हद्दीत हा अपघात झाला. अपघातात बसमधील अनेक प्रवासी अडकले होते. अपघाताची माहिती मिळताच गावकरी मदतीला धावून आले घटनास्थळी महाड, माणगाव इथून बचाव पथके, रुग्णवाहिका रवाना झाल्या. नागरिकांनी बसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना बाहेर काढले.


पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून तब्बल ५५ जण जखमी झाले आहेत. सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला असून जखमींवर नजीकच्या माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. दरम्यान, अपघातामुळे काही काळ विस्कळीत झालेली या मार्गावरची वाहतूक आता सुरळीत सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


कोकणातील रस्त्यांवरुन आणि घाटवळणांतून अनेक अपघातांचे प्रकार समोर येत आहेत. काहीच दिवसांपूर्वी शाळेची सहल कोकण दर्शन करुन परतत असताना घाटात तिचा अपघात झाला होता, ज्यात एका शिक्षकाला जीव गमवावा लागला. यानंतर पुन्हा एकदा अशीच घटना समोर आली आहे.

Comments
Add Comment

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचे नाव

 मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ मुंबई : कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि देशाचे

जहाज बांधणी क्षेत्रात २०३० पर्यंत ४० हजार नोकऱ्या- मंत्री नितेश राणे

रत्नागिरी, रायगड आणि पालघरच्या किनाऱ्यावर उभे राहणार विशाल 'शिप बिल्डिंग' प्रकल्प मुंबई (सुहास शेलार) :

Kokan Railway News : कोकणवासियांसाठी खुशखबर! पावसाळ्यापूर्वी कोकण रेल्वेची मोठी तयारी, युद्धपातळीवर कामे सुरू

नवी मुंबई : कोकणवासियांसाठी आणि कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची