School Bus Accident : शाळेच्या सहलीसाठी कोकणात जात असताना बसचा भीषण अपघात

दोघांचा मृत्यू, तर ५५ जण जखमी


रायगड : गेल्या काही दिवसांत अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यातच रायगडमध्ये (Raigad News) आज सकाळी एक भीषण अपघात (Terrible Accident) झाला. पुण्याहून शाळेची सहल (School picnic) कोकणात येत असताना या ट्रॅव्हल बसचा अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाला, तर ५५ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.


रायगडमधील माणगाव ते पुणे दरम्यानच्या ताम्हीणी घाटात अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने शाळेच्या सहलीची खासगी बस उलटली. कोंडेघर गाव हद्दीत हा अपघात झाला. अपघातात बसमधील अनेक प्रवासी अडकले होते. अपघाताची माहिती मिळताच गावकरी मदतीला धावून आले घटनास्थळी महाड, माणगाव इथून बचाव पथके, रुग्णवाहिका रवाना झाल्या. नागरिकांनी बसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना बाहेर काढले.


पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून तब्बल ५५ जण जखमी झाले आहेत. सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला असून जखमींवर नजीकच्या माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. दरम्यान, अपघातामुळे काही काळ विस्कळीत झालेली या मार्गावरची वाहतूक आता सुरळीत सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


कोकणातील रस्त्यांवरुन आणि घाटवळणांतून अनेक अपघातांचे प्रकार समोर येत आहेत. काहीच दिवसांपूर्वी शाळेची सहल कोकण दर्शन करुन परतत असताना घाटात तिचा अपघात झाला होता, ज्यात एका शिक्षकाला जीव गमवावा लागला. यानंतर पुन्हा एकदा अशीच घटना समोर आली आहे.

Comments
Add Comment

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

Nitesh Rane : महाडला मिळणार आधुनिक मच्छी मार्केट; १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आधुनिक मच्छी मार्केट इमारत

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग

Ratnagiri : गणपतीपुळे दुर्घटनेतील उर्वरित चार तरुणांचे मृतदेहही सापडले

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

गणपतीपुळे दुर्घटनेतील पाचपैकी एकाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे आज सकाळी घडलेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या पाच पर्यटकांपैकी एका तरुणाचा मृतदेह