शाहरूख, रजनीकांत नाही तर या हिरोने दिले ७ सलग ब्लॉकबस्टर सिनेमे, कमावले २२५४ कोटी

Share

मुंबई: दक्षिणेत रजनीकांत, कमल हसन आणि प्रभास तर बॉलिवूडचा शाहरूख खान आणि सलमान खानपासून ते आमिर खानपर्यंत यांना बॉक्स ऑफिसचा किंग म्हटले जाते. त्यांचा प्रत्येक सिनेमा ४००-५०० कोटींची कमाई करतो. मात्र दक्षिणेतील असा एक सुपरस्टार आहे ज्याने सलग ७ सिनेमे ब्लॉकबस्टर दिलेत.

आम्ही बोलत आहोत दक्षिणेतील बॉक्स ऑफिस किंग म्हणजेच थलपती विजयबद्दल. या वर्षी ऑक्टोबरमध्ये रिलीज झालेल्या थलपती विजयच्या लिलोने बॉक्स ऑफिसवर हंगामा केला. ६४ कोटींच्या शानदार ओपनिंगनंतर सिनेमाने जगभरात ६०४ कोटींची कमाई केली.

यासोबतच थलपती स्टार लिओ दक्षिणेतील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला. याने बॉक्स ऑफिसवरील रजनीकांतचा जेलर, कमल हसनचा विक्रम आणि ऐश्वर्या राय बच्चनचा पोन्नियन सेलवनलाही हरवले. लिओमध्ये संजय दत्तने निगेटिव्ह भूमिका साकारली होती. त्याच्या अभिनयाला पसंती मिळाली होती. सिनेमाने तृषाने थलपती विजयच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

लिओ थलपती विजयचा ७वा सिनेमा आहे ज्याने ६५० कोटीहून अधिक कमाई केली आहे. याआधी त्याने सलग ७ सिनेमे ब्लॉकबस्टर राहिले आहेत. याच कारणामुळे विजय सध्या सिनेनिर्मात्यांची पहिली पसंती बनला आहे.

थलपती विजयच्या यशस्वी करिअरबाबत बोलायचे झाल्यास त्याची सुरूवात मर्सलपासून झाली २०१७ मध्ये हा सिनेमा रिलीज झाला होता. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर २२० कोटींहून अधिक कलेक्शन केले होते. २०१८मध्ये आलेला सरकारही ब्लॉकबस्टर ठरला होता. २५२ कोटींचे कलेक्शन केले होते.

बिगिल २०१९मध्ये रिलीज झाला होता आणि हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. याने बॉक्स ऑफिसवर २९५ कोटी कमावले होते. तर कोरोना महामारीदरम्यान रिलीज झालेल्या मास्टरने २२३ ते ३०० कोटींचे कलेक्शन केले होते.

२०२२मध्ये रिलीज झालेल्या बीस्टनेही २२० कोटींचा आकडा पार केला होता. तर २०२३मध्ये रिलीज झालेल्या वारिसूने २९७ कोटींचे कलेक्शन केले होते. जर सर्व सिनेमांचे कलेक्शन एकत्र जोडले तर दाक्षिणात्य सुपरस्टार विजयच्या ७ सिनेमांनी आतापर्यंत २२५४ कोटींहून अधिक रूपयांचे कलेक्शन केले आहे.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

2 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

3 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

3 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

4 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

5 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

5 hours ago