India Vs South Africa Test series : लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघावर आयसीसीची मोठी कारवाई; थेट सहाव्या स्थानावर गेला भारताचा संघ!

Share

काय आहे कारण?

केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना (India Vs South Africa Test series) काल पार पडला. यात भारताचा लाजिरवाणा पराभव झाला. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असणारा भारत थेट पाचव्या स्थानावर घसरला. हा भारतासाठी पहिला मोठा धक्का होता. पण यानंतर आता भारताला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ज्यामुळे भारताची रवानगी गुणतालिकेत पाचव्या स्थानावरुनही खाली सहाव्या स्थानावर झाली आहे. तर सहाव्या स्थानावर असलेला ऑस्ट्रेलिया संघ यामुळे पाचव्या स्थानावर आला आहे.

भारतासमोरच्या अडचणीचे कारण म्हणजे आयसीसीने (ICC) भारताचे २ महत्त्वाचे गुण कमी केले आहेत. याशिवाय आयसीसीने सर्व भारतीय खेळाडूंना मॅच फीच्या १० टक्के दंडही ठोठावला आहे. यामुळे भारताचे मोठे नुकसान झाले आहे. सेंच्युरियन कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसीने संघाला दंड ठोठावला आहे. त्यामुळे गुणतालिकेत भारताला मोठा फटका बसला आहे.

काय आहे कारवाईचे नेमके कारण?

आयसीसीने टीम इंडियाला आचारसंहितेच्या कलम २.२२ अंतर्गत दंड ठोठावला आहे. हे कलम किमान ओव्हर-रेटशी संबंधित आहे. कोणत्याही संघाने दिलेल्या वेळेपूर्वी उशीरा षटक टाकल्यास खेळाडूंना दंड आकारला जातो. जर एखाद्या संघाने एक ओव्हर उशीरा टाकली तर खेळाडूंना मॅच फीच्या ५ टक्के दंड आकारला जातो आणि एक पॉइंट देखील कापला जातो. भारताने २ षटके उशिराने टाकली, त्यामुळे खेळाडूंना त्यांच्या मॅच फीच्या १० टक्के दंड आणि २ गुण कापण्यात आले.

सेंच्युरियन कसोटी सामना गमावल्यानंतर भारताचे १६ गुण होते आणि गुणांची टक्केवारी ४४.४४ होती. परंतु ICC ने २ गुणांचा दंड ठोठावला, त्यानंतर भारताचे १४ गुण आणि गुणांची टक्केवारी ३८.८९ वर आली आहे. आयसीसीच्या या कारवाईनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियापेक्षाही खाली गेला आहे.

Recent Posts

Weather Update : महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना पुढील तीन दिवस महत्त्वाचे!

हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा मुंबई : महाराष्ट्रासह (Maharashtra Rain) संपूर्ण देशभरात पावसाने चांगलीच हजेरी…

48 mins ago

Water Shortage : पुण्यात पाणी कुठेतरी मुरतंय; पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेणार

आमदार धंगेकरांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत उत्तर मुंबई : समान पाणी वाटपाची योजना…

48 mins ago

Manoj Jarange Patil : मराठा बांधव पुन्हा आक्रमक; छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरु केले ‘रास्ता रोको’ आंदोलन!

परिसरात मोठी वाहतूक कोंडी छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे (Manoj…

2 hours ago

Hathras Stampede : हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना २ लाख तर जखमींना ५० हजार रूपयांची मदत

हाथरस : उत्तर प्रदेशचे (Uttar pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी हाथरस येथील…

3 hours ago

SSC-HSC Exam : दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पुरवणी परीक्षेची तारीख जाहीर

मुंबई : दहावी आणि बारावीच्या (SSC-HSC Exam) परीक्षेत अनुत्तीर्ण (Fail) झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर…

4 hours ago

Nutrition Food : OMG! शालेय पोषण आहारात आढळले सापाचे पिल्लू

चिमुकल्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण सांगली : शालेय विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी शालेय पोषण आहार…

5 hours ago