IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाहा काय म्हणाला रोहित शर्मा...

  64

सेंच्युरियन: टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन कसोटीत एक डाव आणि ३२ धावांनी पराभव सहन करावा लागला. या पराभवासोबत भारताचे आफ्रिकेच्या भूमीवर कसोटी जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंग झाले. भारतीय संघाने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना जिंकला तरी मालिकेत बरोबरी साधली जाईल. कसोटी मालिकेतील दुसरा सामना ३ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे.



संपूर्ण संघाचे सामूहिक प्रयत्न गरजेचे - रोहित


पहिल्या कसोटीतील टीम इंडियाच्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माचे विधान समोर आले आहे. रोहितने दोन्ही डावांतील खराब फलंदाजी हे पराभवाचे प्रमुख कारण सांगितले आहे. सोबतच रोहित गोलंदाजांच्या कामगिरीने खुश नाही. रोहितने सांगितले की विजयासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे पहिल्या सामन्यात झाले नाही. दरम्यान, रोहितने यावेळी शतक ठोकणाऱ्या केएल राहुलचे कौतुक केले.


रोहित शर्माने सामना संपल्यावर सांगितले, आम्ही विजयासाठी योग्य नव्हतो. पहिल्यांदा फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर केएलने चांगली बॅटिंग करत आम्हाला सन्मानजनक धावसंख्या मिळवून दिली मात्र आम्ही गोलंदाजीने परिस्थितीचा फायदा उचलू शकलो नाही. त्यानंतर दुसऱ्या डावात आम्ही फलंदाजीत चांगली कामगिरी करू शकलो नाही. जर आम्हाला कसोटी सामना जिंकायचा असेल तर सामूहिकरित्या एकत्र यावे लागेल आणि आम्ही असे केले नाही.


रोहित पुढे म्हणाला, काही खेळाडू आधीही येथे आले आहेत. आम्हाला माहीत आहे की काय अपेक्षा केली पाहिजे आणि प्रत्येकाची आपली योजना असते. आमच्या फलंदाजांना आव्हानात्मक स्थिती मिळाली आणि ते त्यात खरे उतरू शकले नाहीत. हा एक मोठा बाऊंड्री स्कोरिंग मैदान आहे. आम्ही त्यांना मोठा स्कोर करताना पाहिले आहे. मात्र आम्ही प्रतिस्पर्धी आणि त्यांची ताकद समजून घेणे गरजेचे असते. आम्ही दोन्ही डावांत चांगली फलंदाजी करू शकलो नाही.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार