Uttarakhand News : वीटभट्टीची भिंत कोसळून ६ कामगारांचा मृत्यू; ७ जखमी

डेहराडून : उत्तराखंड (Uttarakhand) येथे गेल्या महिन्यात बोगदा कोसळल्याने ४१ मजूर अडकले होते. तब्बल १७ दिवसांनी त्यांची सुटका करण्यात यश आले. यानंतर उत्तराखंडमधून पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विटभट्टीवरील कच्चे बांधकाम असलेली भिंत अंगावर कोसळल्याने ६ मजुरांना जीव गमवावा लागला, तर ७ मजूर जखमी झाले आहेत.


उत्तराखंडच्या रुडकी येथे आज सकाळी ही भीषण अपघाताची घटना घडली. मंगलौर तालुक्यातील लहबोली गावात सकाळी वीटभट्टीवर कामासाठी आलेल्या मजुरांच्या अंगावर विटभट्टीवरील कच्चे बांधकाम असलेली भिंत कोसळली. त्यामध्ये, भिंतीच्या विटांच्या ढिगाऱ्याखाली दबून ६ कामगारांचा मृत्यू झाला व ७ जण गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच लक्सर येथील आमदार मोहम्मद शहजाद, पोलीस अधीक्षक यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व मदतकार्य सुरू करण्यात आले.


लहबोली गावात विटभट्टी कारखानदारी आहे. येथे जवळपास १०० पेक्षा अधिक कामगार काम करतात. यावेळी, कच्च्या विटांची भट्टीत भरणी करण्याचं काम सुरू होतं. त्याचदरम्यान, कच्च्या विटांची भिंत कोसळून दुर्घटना घडली. या ढिगाऱ्याखाली ८ ते १० कामगार दबले. स्थानिकांच्या व आजूबाजूच्या परिसरातील कामगारांच्या मदतीने तसेच जेसीबीच्या मदतीने विटा बाजूला सारुन कामगारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दुर्घटनेत मुकुल, साबिर, अंकित, बाबूराम आणि जग्गी या मजुरांचा जागेवरच मृत्यू झाला. तर आशु, समीरसह ५ जण जखमी झाले आहेत.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात