Uttarakhand News : वीटभट्टीची भिंत कोसळून ६ कामगारांचा मृत्यू; ७ जखमी

डेहराडून : उत्तराखंड (Uttarakhand) येथे गेल्या महिन्यात बोगदा कोसळल्याने ४१ मजूर अडकले होते. तब्बल १७ दिवसांनी त्यांची सुटका करण्यात यश आले. यानंतर उत्तराखंडमधून पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विटभट्टीवरील कच्चे बांधकाम असलेली भिंत अंगावर कोसळल्याने ६ मजुरांना जीव गमवावा लागला, तर ७ मजूर जखमी झाले आहेत.


उत्तराखंडच्या रुडकी येथे आज सकाळी ही भीषण अपघाताची घटना घडली. मंगलौर तालुक्यातील लहबोली गावात सकाळी वीटभट्टीवर कामासाठी आलेल्या मजुरांच्या अंगावर विटभट्टीवरील कच्चे बांधकाम असलेली भिंत कोसळली. त्यामध्ये, भिंतीच्या विटांच्या ढिगाऱ्याखाली दबून ६ कामगारांचा मृत्यू झाला व ७ जण गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच लक्सर येथील आमदार मोहम्मद शहजाद, पोलीस अधीक्षक यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व मदतकार्य सुरू करण्यात आले.


लहबोली गावात विटभट्टी कारखानदारी आहे. येथे जवळपास १०० पेक्षा अधिक कामगार काम करतात. यावेळी, कच्च्या विटांची भट्टीत भरणी करण्याचं काम सुरू होतं. त्याचदरम्यान, कच्च्या विटांची भिंत कोसळून दुर्घटना घडली. या ढिगाऱ्याखाली ८ ते १० कामगार दबले. स्थानिकांच्या व आजूबाजूच्या परिसरातील कामगारांच्या मदतीने तसेच जेसीबीच्या मदतीने विटा बाजूला सारुन कामगारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दुर्घटनेत मुकुल, साबिर, अंकित, बाबूराम आणि जग्गी या मजुरांचा जागेवरच मृत्यू झाला. तर आशु, समीरसह ५ जण जखमी झाले आहेत.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला