Uttarakhand News : वीटभट्टीची भिंत कोसळून ६ कामगारांचा मृत्यू; ७ जखमी

  77

डेहराडून : उत्तराखंड (Uttarakhand) येथे गेल्या महिन्यात बोगदा कोसळल्याने ४१ मजूर अडकले होते. तब्बल १७ दिवसांनी त्यांची सुटका करण्यात यश आले. यानंतर उत्तराखंडमधून पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विटभट्टीवरील कच्चे बांधकाम असलेली भिंत अंगावर कोसळल्याने ६ मजुरांना जीव गमवावा लागला, तर ७ मजूर जखमी झाले आहेत.


उत्तराखंडच्या रुडकी येथे आज सकाळी ही भीषण अपघाताची घटना घडली. मंगलौर तालुक्यातील लहबोली गावात सकाळी वीटभट्टीवर कामासाठी आलेल्या मजुरांच्या अंगावर विटभट्टीवरील कच्चे बांधकाम असलेली भिंत कोसळली. त्यामध्ये, भिंतीच्या विटांच्या ढिगाऱ्याखाली दबून ६ कामगारांचा मृत्यू झाला व ७ जण गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच लक्सर येथील आमदार मोहम्मद शहजाद, पोलीस अधीक्षक यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व मदतकार्य सुरू करण्यात आले.


लहबोली गावात विटभट्टी कारखानदारी आहे. येथे जवळपास १०० पेक्षा अधिक कामगार काम करतात. यावेळी, कच्च्या विटांची भट्टीत भरणी करण्याचं काम सुरू होतं. त्याचदरम्यान, कच्च्या विटांची भिंत कोसळून दुर्घटना घडली. या ढिगाऱ्याखाली ८ ते १० कामगार दबले. स्थानिकांच्या व आजूबाजूच्या परिसरातील कामगारांच्या मदतीने तसेच जेसीबीच्या मदतीने विटा बाजूला सारुन कामगारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दुर्घटनेत मुकुल, साबिर, अंकित, बाबूराम आणि जग्गी या मजुरांचा जागेवरच मृत्यू झाला. तर आशु, समीरसह ५ जण जखमी झाले आहेत.

Comments
Add Comment

नारी शक्तीच्या कामगिरीने संपूर्ण देशाचा अभिमान वाढवला : पंतप्रधान

नवी दिल्ली: आपल्या माता-भगिनी-कन्यांनी प्रत्येक टप्प्यावर आव्हानांना सामोरं जावं लागणारा काळ पाहिला आहे. पण आज,

आसाममध्ये ३.३७ लाख नागरिकांना पुराचा तडाखा, २३ मृत्यू

दिसपूर : आसामच्या १२ जिल्ह्यांमध्ये पुराता तडाखा बसला आहे. याठिकाणचे सुमारे ३.३७ लाख नागरिक अजूनही पुराच्या

Corona Updates: देशभरात कोरोनाचे ६,१३३ रुग्ण, २४ तासांत ६ जणांचा मृत्यू!

नवी दिल्ली: देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ (Corona Cases In India) लागली आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे

जागतिक महासागर दिवस २०२५: भारतातील ५ सर्वात स्वच्छ किनारे कोणते आहेत जे तुम्ही एक्सप्लोर केले पाहिजेत?

देश-विदेशातील लोक भारताची संस्कृती, खाद्यपदार्थ आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी येतात. आता जर तुम्ही कुठेतरी

दंगल सुरू झाल्यामुळे मणिपूरच्या पाच जिल्ह्यांत पाच दिवस इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क बंद

इंफाळ : राष्ट्रीय तपास संस्थेने अर्थात एनआयएने मैतेई ग्रुप आरंबाई टेंगोलच्या पाच जणांना अटक केली आहे. यातील एक

एलॉन मस्क यांच्यावरून ट्रम्प - पुतिन यांच्यात जुंपणार?

रशियाने देऊ केला राजकीय आश्रय वॉशिग्टन: टेस्ला कंपनीचे सीईओ आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प