राज ठाकरे VVIP तर उद्धव ठाकरे हे आयत्या बिळातले नागोबा!

राम मंदिरावरुन टीका करणा-या, टोमणे मारणा-यांना उद्घाटनासाठी बोलवण्याचे कारण काय?


महाराष्ट्र भाजपचा मोठा दावा


मुंबई : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराचे (Ram Mandir) लोकार्पण सोहळ्यासाठी देशातील व्हीव्हीआयपी व्यक्तींनाच निमंत्रित करण्यात आले आहे. केंद्राच्या व्हीव्हीआयपी यादीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नाहीत पण राज ठाकरे (Raj Thackeray) असतील, असे वक्तव्य भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.


उद्धव ठाकरे नेहमी राम मंदिरावरुन टीका करतात. याआधी मंदिर वहीं बनायेंगे, मगर तारीख नहीं बतायेंगे, असे टोमणे मारायचे. त्यानंतर राम मंदिर उद्घाटनादरम्यान दंगली होतील, अशी आवई उठवली. कारसेवेत आम्हीच पुढे होतो, अशी सपशेल खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती ते देत असतात. त्यामुळे अशा खोटारड्या, राम मंदिरावरुन टीका करणा-या, टोमणे मारणा-या उद्धव ठाकरेंना राम मंदिराचे लोकार्पण सोहळ्यासाठी बोलवण्याचे कारण काय?' असा सवाल देखील गिरीश महाजनांनी केला आहे.


गिरीश महाजन म्हणाले, केंद्राच्या व्हीव्हीआयपी यादीत उद्धव ठाकरे नसतील मात्र राज ठाकरे असतील. अयोध्येच्या राम मंदिरावरुन आमच्यावर टीका केली त्यांना बोलवण्याचे कारण काय? उद्धव ठाकरेंचं अयोद्धेच्या राम मंदिराच्या उभारणीत काय योगदान हे सर्वांना माहिती आहेत. ते साधे एमएलसी तेही पहिल्या टर्मचे आहेत. त्यामुळे कदाचित केंद्राच्या व्हीव्हीआयपींच्या लिस्टमध्ये ते नसतील किंवा आणखी काही कारण असेल.



संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी कारसेवेचा एखादा फोटो दाखवावा


गिरीश महाजनांनी संजय राऊतांवर देखील टीका केली आहे. गिरीश महाजन म्हणाले, घरी बसून भूमिका घेण्यात आणि प्रत्यक्ष करण्यात फरक आहे. राज्याला आणि देशालाही माहिती आहे आम्ही कारसेवक जेलमध्ये होते. घरात बसून भूमिका घेणं आणि प्रत्यक्ष कारसेवा करणं यात फरक आहे. आम्ही २० दिवस जेलमध्ये होते. त्यावेळी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कुठे होते? बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेबाबत दुमत नाही. मात्र जे बोलतायेत ते आयत्या बिळावरचे नागोबा आहेत. संजय राऊतांनी, उद्धव ठाकरेंनी कारसेवेचा एखादा फोटो दाखवावा.



मनोज जरांगे पाटलांना मुंबईत यायची गरज पडणार नाही


मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी २० जानेवारीला मनोज जरांगे (Manoj Jarange) मुंबईच्या (Mumbai) दिशेने निघणार आहेत. गिरीश महाजन म्हणाले, मनोज जरांगे पाटलांना मुंबईत यायची गरज पडणार नाही. त्याआधीच एक महिन्याच्या आत पर्मनंट आरक्षण मिळेल. जलद गतीने काम सुरु आहे. छगन भुजबळांना विनंती केली आहे की, आपापसांत भांडू नका. टीका करुन दोन समाजात तेढ निर्माण करु नका.


दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते की, आम्हाला राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण येणार नाही. अडवाणींना ज्यासाठी आमंत्रण दिले गेलेले नाही त्याच कारणास्तव आम्हाला आमंत्रण दिले गेलेले नाही. कारण आमचे त्यांचे योगदान आहे. आम्ही त्या प्रकरणातले आरोपी आहोत. ज्यांचे काही योगदान नाही त्यांचा तो सोहळा आहे.


तेव्हा विश्वस्त समितीने उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देणार असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मात्र अद्यापही पुढे काहीच हालचाल झालेली नाही. त्यातच महाजन यांनी केलेल्या या वक्तव्याने आता उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळणार की नाही, अशा जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर

मुंबई : इराण-अमेरिका युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा परिणाम देशातील पेट्रोलियम

Mrinal Tai Gore Flyover Extension : अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगावकरांचा वेळ वाचणार, मृणालताई गोरे विस्तारीत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव पश्चिम येथील राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोडदरम्यानच्या मृणालताई गोरे

The Fort owners : किल्लेदारांनी बोटीतून केली मिठी नदीची सैर... दाखवला नदीत कचऱ्यासह तीन फुटांपर्यंतचा गाळ

मुंबई : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात असून सत्ताधारी पक्षाकडून प्रत्येक

Chandrashekar Bawankule : देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याच्या प्रारूपाला स्थगिती

सुधारित प्रारूपासाठी खारगे समिती स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : महाराष्ट्रातील

Weekly Public Transport Day in BKC : बीकेसीमध्ये दर शुक्रवारी पाळणार ‘साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन’

- इंधन बचतीसाठी निर्णय; २ लाख कर्मचारी करणार सार्वजनिक प्रवासी वाहनांचा वापर मुंबई : जागतिक इंधन तुटवड्याच्या

Mumbai News : मुंबईत १५ वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य? सात बांगलादेशी नागरिक अटकेत, पोलिसांचा तपास सुरू

मुंबई : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अवैध स्थलांतराविरोधात मोठी कारवाई करत सात बांगलादेशी (Bangladeshi) नागरिकांना अटक केली