Nana Patekar : देशाला भाजपशिवाय पर्याय नाही, पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार

अभिनेते नाना पाटेकर यांचं मोठं वक्तव्य


मुंबई : अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) हल्ली त्यांच्या अनेक राजकीय वक्तव्यांमुळे (Political statements) चर्चेत येत राहतात. त्यांचा काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला 'द व्हॅक्सिन वॉर' (The vaccine war) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करु शकला नाही. सध्या ते त्यांच्या आगामी 'ओले आले' (Ole ale) या मराठी चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहेत. त्यातच त्यांनी एक राजकीय भाकीत केल्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 'यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाच निवडून येणार', असा दावा त्यांनी केला आहे.


एका वाहिनीच्या पत्रकाराने त्यांना आगामी लोकसभा निवडणुकांविषयी काय वाटतं, असा प्रश्न विचारला. त्यावर प्रतिक्रिया देताना नाना पाटेकर म्हणाले, "आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला साडे तीनशे ते पावणे चारशे जागा मिळतील. देशभरात हे सरकार शानदार काम करत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांना यश नक्कीच मिळेल. तसेच भाजपाला पर्याय नाही. भाजपला बहुमत मिळणार आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होणार, यात काही शंका नाही", असं वक्तव्य नाना यांनी केलं आहे.





पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठं यश मिळालं. चारपैकी तीन राज्यांत भाजपने बाजी मारली. ही निवडणूक लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल समजली जात होती. त्यात घवघवीत यश मिळवल्याने भाजप लोकसभा निवडणुकीतही घवघवीत यश मिळवण्याच्या मार्गावर आहे. त्यातच नाना पाटेकर यांनी भाजपला बहुमत मिळणार असं वक्तव्य केल्याने आता हे भाकीत खरं ठरणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात

इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत वारकऱ्यांची गैरसोय; मुंबई डबेवाले करणार भोजन व निवासाची व्यवस्था

Mumbai  : खेड, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे

Heavy Rain in Mumbai Pune : पावसाचा कहर! मुंबई-ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्यात १२ जुलैपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी उद्या

Flood in Indrayani : इंद्रायणीला पूर; वारकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आवाहन! आळंदीत न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीकडे निघालेल्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य

TET Exam Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! चारही आरोपींना १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

भिवंडी : राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मोठी घडामोड झाली

Minister Shivendrasinhraje Bhosale : मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची घटनास्थळी धाव; बोगद्याला कोणतीही हानी नाही

- सुरक्षिततेनंतरच वाहतूक सुरू होणार मुंबई : मुंबई–पुणे कनेक्टिंग लिंक (Mumbai - Pune Missing Link) प्रकल्पाच्या एंट्री पॉईंटजवळ